मुंबई

परतीच्या अवकाळी पावसात खालापूर-खोपोली परिसरात भातपिकांची नासाडी

प्रमोद जाधव

खोपोली : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर शनिवारी (ता. 10) खोपोली-खालापूर परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. या अवकाळी पावसाने तयार झालेले आणि कापणी झालेल्या भातपिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतल्याने आणि ढगाळ वातावरण कायम असल्याने शेतकऱ्यांनी आहे त्या स्थितीत भातकापणीला सुरुवात केली होती. मात्र, शनिवारी अचानक झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यातच भातपीकही आडवे झाले असून कोंब फुटण्याची स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस पावसाची शक्‍यता असल्याने नुकसान अधिक होण्याची भीती वाढली आहे. 

कापणीसाठी मजूर व अन्य जुळवाजुळव सुरू असतानाच शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान केले आहे. शेतात पाणी भरल्याने कोंब फुटण्याची भीती आहे. 
- दत्तात्रय दिसले,
शेतकरी, केळवली

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बनावट आयपीएसने आधीही केलेत कांड, परराज्यात नावावर गुन्हा; पत्नी आहे पोलीस अधिकारी

Sharad Pawar & Ajit Pawar : जे कोल्हापुरात होतं ते राज्यात होतं, स्थानिक स्वराज्य संस्थेत शरद पवार; अजित पवार एकत्र निवडणूक लढवणार

Latest Marathi News Live Update : माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार

Girish Mahaja : नाशिक-त्र्यंबक रस्ता पाडकाम वाद मिटला! गिरीश महाजनांच्या आश्वासनानंतर १३ दिवसांचे साखळी उपोषण स्थगित

Vasudev Tradition: 'परंड्यातील सुरेश सुरवसेंकडून वासुदेव संस्कृतीचे जतन'; पदवीपर्यंत शिक्षण घेऊन जपली पिढ्यांपासूनची परंपरा..

SCROLL FOR NEXT