Palghar Railway Accident  sakal
मुंबई

Palghar Railway Accident : अखेर २६ तासांनी विरारकडे सुटली पहिली लोकलं, रेल्वेच्या प्रयत्नांना आले यश

सकाळ वृत्तेसवा

Mumbai News: मंगळवार 28 मे सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी पालघरच्या रेल्वे वार्डात मालगाडी घसरल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या अप मार्गिकेवरील रेल्वे सेवा खंडित झाली होती. सुमारे सव्वीस तासांचे दुरुस्तीचे काम पूर्ण करून 29 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता विरार कडे पहिली लोकल पालघर येथून सोडण्यात आली.(palghar local Accidnet)

28 मे. मंगळवारी सायंकाळी पालघर रेल्वे वार्डात मालगाडी घसरल्याने गुजरात कडून मुंबईकडे येणाऱ्या मार्गीके वरील वाहतूक ठप्प झाली होती. घसरलेल्या मालवाहू डब्यांना सरकविण्याचे काम तसेच नव्याने स्लीपर अंथरून त्यावर रेल्वे रूळ उभारण्यासाठी युद्धपातळीवर दिवस-रात्र काम सुरू होते. त्याचबरोबर वाकलेला विद्युत वाहिनीचा खांब बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते. विभागीय रेल्वे अधिकारी (डीआरएम) नीरज वर्मा यांच्या सह वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांच्या देखरेखीखाली 500 पेक्षा अधिक मनुष्यबळाच्या मदतीने काम सुरू होते.(palghar railway Accident)

घसलेला एक डबा बाजूला सरकविणे व विद्युत प्रणाली पूर्ववत केल्यानंतर चाचणी घेल्यानंतर मुंबई कडे जाणारी मार्गिका खुली करण्यात आली. 29 मे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत होईल असे सांगण्यात आले होते.

अखेर सुमारे सव्वीस तासांचे दुरुस्तीचे काम पूर्ण करून 29 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता विरार कडे पहिली लोकल पालघर येथून सोडण्यात आली.(Railway News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी, हातात पक्षाचा झेंडा; NDAच्या शिबिरात नेत्यांचा प्रताप, काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : ३२ टक्के राजकारणी घराणेशाहीचे प्रतिक; ‘एडीआर’च्या अहवालातील महाराष्ट्राची स्थिती

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

Wholesale Inflation India : घाऊक महागाईचा दर वाढला! 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आकडेवारी, सामान्य जनतेला फटका

SCROLL FOR NEXT