file photo
file photo
मुंबई

पहाटेच्या सुमारास ठाण्यात कोसळला इमारतीचा भाग

दीनानाथ परब

मुंबई: दरवर्षी पावसाळ्यात मुंबईसह शेजारच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली भागात इमारती कोसळण्याच्या (building collapsed) घटना घडतात. जुन्या-जर्जर झालेल्या या इमारती कोसळून होणाऱ्या दुर्घटनांमध्ये अनेक निष्पाप व्यक्तींना आपल्या प्राणांना मुकावे लागते. दरवर्षी मुंबई महानगर क्षेत्रात अशा घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू होता. काही वेळा पालिका किंवा अन्य यंत्रणांकडून इमारती रिकाम्या करण्याच्या नोटीसा पाठवल्या जातात. पण पर्यायी जागेची व्यवस्था नसल्यामुळे किंवा दिलेली जागा राहण्यायोग्य नसल्यामुळे नागरिक आपला जीव धोक्यात घालून त्याच धोकादायक इमारतींमध्ये राहतात. (Part of a building collapsed in Thane West area)

मग अचानक एकदिवस इमारत कोसळल्याची बातमी येते. यंदाच्या पावसाळ्यात सुद्धा इमारत कोसळण्याचे सत्र थांबलेले नाही. इमारत कोसळून दुर्घटना झाल्यानंतर मग त्यावरुन जोरदार राजकारण सुरु होतं. राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होता. पालिका, राज्य सरकारला जबाबदार धरलं जाते. मालाड मालवणी इमारत दुर्घटनेमध्ये हे दिसून आलं.

मालवणी इथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर दहीसरमध्ये घर कोसळण्याची दुर्घटना घडली. काल रात्री मुलुंड पश्चिम येथे पावसामुळे एक भिंत कोसळल्याची घटना घडली असून यामध्ये एकाचा मृ्त्यू झाला आहे. दिलीप वर्मा (वय ३५) असं अंगावर भिंत कोसळून मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. आज पहाटे ठाणे पश्चिमेला असलेल्या इमारतीचा काही भाग कोसळला. पण यामध्ये कोणतीही जीवीतहानी झालेली नाही, असे ठाणे महापालिकेकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT