Mumbai Pollution sakal
मुंबई

Mumbai Pollution: मुंबईकरांनो काळजी घ्या ; प्रदूषणामुळे वाढत आहे 'या' आजारांची संख्या

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Pollution: तळोजा एमआयडीसी परिसरात बुधवारी रात्री आठच्या सुमारास केमिकलचा उग्रवास येऊ लागल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. याबाबत नागरिकांनी तत्काळ महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्याच्या हा प्रकार निदर्शनास आणून दिला. त्यानंतर उग्र वासाचे प्रमाण कमी झाले. वाढत्या प्रदूषणाविषयी सामाजिक कार्यकर्त्यांकडून अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्‍यक्त करण्यात येत आहे. तळोजा, खारघर, कळंबोली आणि पनवेल परिसरात प्रदूषणामुळे खोकला, दमा आणि सर्दीचे रुग्ण वाढले असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

तळोजा औद्योगिक क्षेत्रातून रात्री सोडण्यात येणाऱ्या केमिकलच्या उग्र वासामुळे तळोजा, खारघर, रोडपाली, कळंबोली आणि जवळपास असलेल्या गावातील नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार परिसरातील सामाजिक संस्था तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकायुक्तांकडे केली होती. लोकायुक्तांनी एसआयटी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले.

तसेच परिसरात वायुप्रदूषण मोजमाप करणारे स्वयंचलित यंत्र बसविण्यात आले होते. त्यानंतर प्रदूषण काही दिवस कमी झाले होते. मात्र, आता पुन्हा तळोजा एमआयडीसी परिसरातून रात्री हवेत सोडल्या जाणाऱ्या केमिकलयुक्त वायूमुळे प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बुधवारी रात्री आठच्या सुमारास केमिकलचा उग्र वास येऊ लागल्यानंतर त्याबाबतचा मजकूर सोशल मीडियावर व्‍हायरल झाला. याबाबत तळोजा वसाहत तसेच एमआयडीसीलगत असलेल्या गावातील रहिवाशांनी खात्री केल्यानंतर तत्काळ प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली.

त्यानंतर काही वेळाने उग्र वासाचे प्रमाण कमी झाले. दरम्यान तळोजा एमआयडीसी, तळोजा वसाहत, खारघर आणि पनवेल परिसरातील काही डॉक्टरांकडे विचारणा केली असता वाढत्या प्रदूषणामुळे घसादुखी, सर्दी-पडसे, खोकला, दमा, वारंवार सर्दी या आजारांचे रुग्ण वाढल्याचे सांगण्यात आले. श्वसन विकारांच्या रुग्णांत वाढ होत असल्याचे पनवेल येथील डॉ. नीलेश चिंचकर यांनी ‘सकाळ’ला सांगितले. याविषयी प्रदूषण महामंडळाचे विभागीय अधिकारी विक्रांत भालेराव यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

तळोजा औद्योगिक परिसरातून सोडल्या जाणाऱ्या केमिकलसारख्या उग्रवासाचा त्रास रहिवाशांना होत आहे. उग्र वासामुळे वारंवार सर्दी होणे, खोकला आणि दमा यांसारख्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

- डॉ. संतोष जगे, पेंधर-तळोजा एमआयडीसी

-------------

तळोजा परिसरात बुधवारी रात्री सात ते आठच्या सुमारास उग्र वास पसरला होता. प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर प्रमाण कमी झाले.

- अंकुश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते, तळोजा वसाहत

सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे तक्रार

तळोजा एमआयडीसी परिसरातून सोडल्या जाणाऱ्या जल आणि वायु प्रदूषणाविरोधात तळोजा वसाहतीतील रहिवासी राजीव सिन्हा यांनी काही दिवसांपूर्वी पुणे राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेऊन हरित लवादाकडून प्रदूषणाविषयी ऑनलाईन सुनावणी झाली होती. या तक्रारीची दखल घेऊन तक्रारदार सिन्हा यांना सीईटीपी प्लांट, कचरा व्यवस्थापन, मासे आणि रासायनिक कंपन्यांकडून होणाऱ्या दुर्गंधीविषयी पुरावे सादर करण्याची सूचना केली आहे. मात्र तक्रार असलेल्या कंपन्यांचे व्‍यवस्थापन आम्हाला कंपनींच्या आवारात प्रवेश करण्याची परवानगी देईल का, असा प्रश्न उपस्थित करून सिन्हा यांनी थेट दिल्ली येथे राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे ऑनलाईन तक्रार राजीव सिन्हा यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT