मुंबई

लसीकरणासाठी ४५ वर्षावरील नागरिकांचा उत्साह कमी

शर्वरी जोशी

महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट आल्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण पसरलं आहे. यामध्येच एकीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याचं दिसून येत आहे. तर, दुसरीकडे लसीकरणाचा वेगदेखील वाढवल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत वयवर्ष साठ वर्षावरील आणि सहव्याधी व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात येत होती. मात्र, सहव्याधी आता १ एपिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. मुंबई १०८ केंद्रांवर ही मोहीम सुरू झाली असून या मोहिमेला ४५ वर्षांवरील व्यक्तींचा प्रतिसाद कमा असल्याचं पाहायला मिळत आहे. 

१ एप्रिलपासून सुरु झालेल्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांना लसीकरणाची मुभा देण्यात आली असून अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, या मोहिमेला ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत ४५ वर्षांवरील व्यक्ती कमी प्रतिसाद देत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाकडून लसीकरणाच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. तसंच नागरिकांना जास्तीत जास्त लसीकरणाचा लाभ घेता यावा यासाठी सुट्टीच्या दिवशीही लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, तरीदेखील ४५ वर्षांवरील व्यक्ती लसीकरणासाठी फारसे उत्साही दिसत नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच  गेल्या २ ते ३ दिवसांपासून लसीकरण करणाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचं समोर आलं आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: अमरावतीच्या सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संप कायम

SCROLL FOR NEXT