मुंबई

"कंगनाचे ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी सस्पेंड करा"; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

- सुनीता महामुणकर

मुंबई, ता. 3 : नेहमी सुसाट ट्विटकरुन वादात सापडणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी सस्पेन्ड करण्याची मागणी करणारी फौजदारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. कंगना ट्विटमधून सामाजिक अशांतता आणि धार्मिक तेढ निर्माण करते, असा आरोप याचिकेत केला आहे.

ऍडव्होकेट अली काशिफ खान देशमुख यांनी ही याचिका केली आहे. याचिकेत कंगनासह, ट्विटर आणि राज्य सरकारला प्रतिवादी केले आहे. सतत द्वेष पसरविणारे, आधारहिन आणि प्रतिमा मलीन करणारे ट्विट ती करत असते. यामुळे लोकांमध्ये गैरसमज आणि तणाव निर्माण होत आहे, त्यामुळे तीचे अकाऊंट निलंबित करावे, अशी मागणी याचिकेत केली आहे. 

याचिकेत ट्विटरला देखील प्रतिवादी केले आहे. ट्विटरने यापूर्वी कंगनाच्या बहिणीचे ट्विटर अकाऊंट काही कालावधीसाठी याच कारणामुळे निलंबित केले होते.सामाजिक तेढ निर्माण करू नये, असा ट्विटरचा नियम आहे, असेही याचिकेत म्हटले आहे. कंगनाने केलेली विविध ट्विटचा दाखला यामध्ये दिला आहे. पाकव्याप्त काश्मीर, शेतकरी, विशिष्ट समाज गट आदींचा समावेश यामध्ये आहे. देशमुख यांनी कंगना विरोधात वांद्रे न्यायालयातही यापूर्वी तक्रार केली आहे.

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी मोर्चावरील एक ट्विटही सध्या कंगनासाठी त्रासदायक ठरले आहे. हे ट्विट तीने डिलीट केले आहे. मात्र त्याविरुद्ध पंजाबमध्ये तक्रार दाखल झाली आहे.

petition filed in bombay high court permanently suspend twitter account of kangana ranaut

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT