experts 
मुंबई

मुंबईत स्वबळ म्हणजे ताकदीचा आखाडा

दीपा कदम - सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - राजकीय ताकद दाखविण्यासाठी शिवसेना आणि भाजपने मुंबई महापालिकेतील युती तोडली असून, या स्पर्धेत जो जिंकेल तो सामर्थ्यवान ठरणार आहे. शिवसेना-भाजपसाठी ही केवळ निवडणूक ठरणार नसून एकमेकांचे बळ दाखविण्यासाठीचा आखाडा असणार असल्याचे मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे. आर्थिक राजधानीवर स्वतंत्र झेंडा फडकावणे म्हणजे वाढलेल्या राजकीय ताकदीवर शिक्‍कामोर्तब होणार आहे.

शिवसेना-भाजपची युती विधानसभा निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेतही तुटल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीत रंग भरण्यास सुरवात झाली आहे. महापालिका निवडणुकीत प्रमुख स्पर्धक शिवसेना आणि भाजपच राहावेत आणि प्रचाराची सूत्र या दोन्ही पक्षांभोवती फिरत राहून, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत वापरलेली रणनीती मुंबई महापालिकेसाठीही वापरली जात आहे. याविषयी मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. सुरेंद्र जोंधळे यांनी सांगितले, की कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीप्रमाणे निवडणुकीनंतर सत्तेत एकत्र येण्याचा पर्याय कायम असणार आहे. निवडणुकीनंतर युती झाल्यानेही काही फरक पडणार नाही. यापूर्वी विधानसभा निवडणुकीतही शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र निवडणुका लढविल्या आणि मग नंतर सत्तेत आलेच आहेत. प्रश्‍न आता सर्वाधिक जागा शिवसेना जिंकणार की भाजप, हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. याबाबतीत हे दोन्ही पक्ष अतिरेकी महत्त्वाकांक्षी आहेत, हे युती तुटल्याने स्पष्ट होत आहे. युती तोडल्याचा दोन्ही पक्षांना तोटा आणि फायदा होणार आहे. शिवसेनेला सत्ताविरोधी जनमताचा फटका नक्‍कीच बसू शकतो. कारण पाच वर्षांपूर्वीचे आणि आताचे मुंबईचे सामाजिक प्रवाह बदलले आहेत, त्यामुळे भाजपबरोबर असती तर त्याचा फायदा शिवसेनेला झाला असता.

निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमधील या राजकीय स्पर्धेतून वाढलेले राजकीय बळ, नेतृत्वावर शिक्‍कामोर्तब यासाठीही महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपसाठी ही योग्य संधी आहे. राज्यात आणि केंद्रात सत्ता असणे भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. महापालिका निवडणूक लढविण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षासाठी ही योग्य वेळ ठरणार आहे, ती भाजपने साधल्याचे मतही जोंधळे यांनी व्यक्‍त केले.

शिवसेनेप्रमाणे भाजपचे राजकीय बळ मुंबईच्या कानाकोपऱ्यांत नाही. त्यामुळे कदाचित त्यांना उमेदवार आयात करावे लागतील; त्यामुळे युती टिकवण्याचा त्यांनीही प्रयत्न करायला हवा होता.
- प्रा. सुरेंद्र जोंधळे, मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT