मुंबई

महाराष्ट्रात सरकार स्थापन होणार की महाराष्ट्रात लागणार मध्यावधी ?

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा सोपा कौल महाराष्ट्राच्या जनतेनं दिला होता. हा कौल होता शिवसेना भाजप महायुतीला. तब्बल 161 जागा महायुतीच्या पारड्यात पडल्या. मात्र, परस्परांबद्दलचा अविश्वास आणि जागावाटपातल्या संभ्रमातून युती फुटली आणि न भूतो अशी परिस्थिती निर्माण झाली. भाजपकडे सर्वाधिक 105 जागा असल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शनिवारी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होतं. मात्र, आपल्याकडे संख्याबळ कमी असल्याचं म्हणत भाजपनं सरकार स्थापनेला असमर्थता दर्शवली..

भाजपनं असमर्थता दर्शवताच राज्यपालांनी शिवसेनेला सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलं. त्यानंतर जोरदार हालचाली सुरू झाल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झाले..राष्ट्रवादीच्या अटीनुसार अरविंद सावंत यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी शरद पवारांशी चर्चा केली. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी यांच्यात चर्चा झाली..मात्र, ही चर्चा काही फळाला आली नाही. शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांचं समर्थनपत्र मिळवता आलं नाही. त्यातच त्यांनी मागितलेला वाढीव वेळ देण्यासही राज्यपालांनी नकार दिला. त्यामुळे शिवसेनेचं सरकार स्थापन करण्याचं स्वप्न भंगलं.

त्यानंतर तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांनी विचारणा केली. मात्र, त्यांनीही वाढीव वेळ मागितला. त्यांचीही ही विनंती राज्यपालांनी फेटाळली आणि अखेर दुपारीच राज्यपालांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. संध्याकाळच्या सुमारास राष्ट्रपतींनी या शिफारशींवर शिक्कामोर्तब केलं.

दरम्यानच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटात जोरदार हालचाली सुरू होत्या. त्यामुळे राष्ट्रपती राजवट किती काळ टिकते? सरकार स्थापन करण्याचे पुन्हा प्रयत्न होतात की काही काळानं थेट निवडणुकीलाच सामोरं जावं लागतं, हे नजिकच्या काळात दिसून येईल.

WebTitle : presidents rule in Maharashtra now what will be political scenario in Maharashtra

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : भारतीय देशांतर्गत हवाई क्षेत्र जगात सर्वाधिक वेगाने विकसित होत असून सध्या ते तिसऱ्या क्रमांकावर - मोहन नायडू

SCROLL FOR NEXT