मुरबाड (ठाणे) - देशातील भाजपचे सरकार हे खोटारडे सरकार असल्याची टीका माजी मंत्री गणेश नाईक यांनी मुरबाड येथे केली. सरकारने जनतेला दिलेली रोजगार निर्मिती, काळा पैसा लोकांच्या खात्यात जमा करण्याचे वचन पाळले नाही.
मुरबाड येथे गुरुवारी ता. 6 आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश आंदोलनामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक भाषेत केंद्र व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली तसेच महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांचे घरावर मोर्चा काढण्याचा इशारा ठाणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा विद्याताई वेखंडे यांनी दिला.
वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे दररोज वाढणारे भाव महावितरण कार्यालयाचा गलथान कारभार याविरोधात आवाज उठविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुरबाड येथील सुभाषदादा पवार सभागृहा पासून तहसीलदार कार्यालया पर्यंत मोर्चा काढण्यात आला तहसीलदार कार्यालया समोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले त्यावेळी सरकारवर टीका करण्यात आली.
मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री गणेश नाईक, माजी आमदार गोटीराम पवार, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, ठाणेजिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दशरथ तिवरे महिला अध्यक्षा विद्याताई वेखंडे, मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रामभाऊ दळवी यांनी केले मोर्चासाठी कल्याण शहापूर अंबरनाथ येथूनही कार्यकर्ते आले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.