रायगड जिल्ह्यातील माोबाईल सेवा ठप्प आहे.
रायगड जिल्ह्यातील माोबाईल सेवा ठप्प आहे. 
मुंबई

रायगड जिल्हा संपर्क क्षेत्राबाहेर

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : काही दिवसांपासून सुरू असलेली जोरदार पर्जन्यवृष्टी आणि त्यानंतर ठिकठिकाणी आलेला पुराचा फटका रायगड जिल्ह्यातील दूरसंचार क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे बहुतांश मोबाईल कंपन्यांची सेवा चार दिवसांपासून ठप्प झाली असून दूरध्वनी केल्यानंतर ग्राहक संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचा संदेश ऐकू येत आहे. या कंपन्यांची इंटरनेट सेवाही कासवगतीने किंवा बंद आहे. पूरकोंडीनंतर स्वकीयांबरोबर संपर्क होत नसल्याने अनेक जण कासावीस आहेत. 

जिल्ह्यातील दूरसंचार सेवा बेभरवशाची आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे बीएसएनएल आणि अन्य कंपन्यांच्या केबल तुटल्या होत्या; त्याचा परिणाम सेवेवर झाला होता. आता मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील संपर्क यंत्रणा पूर्णपणे विस्कळित झाली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. पुरात अडकलेल्या नातेवाईकांची विचारपूसही करता येत नाही. त्यांना मदत करण्यातही अडचणी येत आहेत. 

बीएसएनएलच्या पाताळगंगा टेलिफोन एक्‍स्चेंजमध्ये तीन दिवस पाणी तुंबले होते. त्यामुळे सेवा खंडित झाली होती. आता तात्पुरत्या स्वरूपात दूरध्वनी सेवा सुरू करण्यात आली असल्याची माहिती भारत संचार निगमचे पनवेल उपविभागीय अभियंता एस. जी, कोहोडकर यांनी दिली. 

श्रीवर्धन, म्हसळा तालुक्‍यांमध्ये वीजपुरवठा नाही. त्यामुळे येथे दूरध्वनी यंत्रणा बंद आहे. आपत्तीच्या दरम्यान संपर्क यंत्रणा सक्षम असावी यासाठी भर देण्यात येतो; मात्र या वर्षी विस्कळित झालेल्या संपर्क यंत्रणेचा परिणाम बचावकार्यावरही होत आहे, असे अलिबागमधील रहिवासी संजय पाटील यांनी सांगितले. 
 
संबंधित अधिकाऱ्यांचा अल्प प्रतिसाद 
रायगड जिल्ह्यातील दूरसंचार सेवा सुरळीत व्हावी यासाठी मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू होण्यापूर्वीच नवीन केबल टाकण्याचा प्रस्ताव बीएसएनएलकडे स्थानिक अधिकाऱ्यांनी पाठवला होता. परंतु वरिष्ठ कार्यालयाकडून अजूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचे समजते. 

बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी केबल टाकण्यासाठी रितसर परवानगी घेतलेली नाही. महामार्गाचे काम सुरू असताना या केबल नादुरुस्त झालेल्या असाव्यात. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधून केबल टाकण्याचे काम केल्यास सर्वांसाठी सोईचे होणार आहे. 
- एस. के. फेगडे, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 
 
मुसळधार पावसानंतर बीएसएनएलच्या रायगड जिल्ह्यातील अनेक टेलिफोन एक्‍स्चेंज सेंटरमध्ये पाणी शिरलेले आहे. त्याचबरोबर वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे दूरध्वनी, इंटरनेट सुविधेत अडथळा येत आहे. दुरुस्तीसाठी आणखी वेळ 
लागणार आहे. दुरुस्तीसाठी पुरेसा निधी नसल्याने विचारपूर्वक खर्च करावा लागत आहे. 
- एस. जी. कोहोडकर, उपविभागीय अभियंता, पनवेल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT