कर्जमुक्तीचे पैसे तीन दिवसांत 
मुंबई

कर्जमुक्तीचे पैसे तीन दिवसांत

सकाळ वृत्तसेवा

म्हसळाः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणिकरणासह प्रत्यक्ष कार्यवाहीची सुरुवात झाली आहे. म्हसळा तालुक्‍यातील कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या असून, आज चार दिवस उलटून केवळ 61 टक्के कर्जदार शेतकऱ्यांचे आधार प्रामाणिकरण केल्याचे नायब तहसीलदार के. टी. भिंगारे यांनी सांगितले. येत्या तीन दिवसांत कर्ज खात्यावर रक्‍कम जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासन सज्ज
 
म्हसळा तालुक्‍यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 11 बॅंकांच्या माध्यमातून अपलोड झालेली एकूण खाती 521 आहेत. प्रसिद्ध झालेली खाती 356 आहेत. आधार प्रमाणिकरणाचे काम झालेली खाती 217 आहेत. फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंर्तगत ज्या शेतकऱ्यांची नावे आधार प्रमाणिकरणाच्या यादीत प्रसिद्ध झाली आहेत, त्यांनी यादीतील नमूद विशिष्ट क्रमांक, आधार कार्ड आणि बचत खाते पासबुक घेऊन जवळच्या आपल्या सरकार सेवा केंद्र, बॅंक शाखेत जाऊन आधार प्रमाणिकरण करणे आवश्‍यक आहे. 

मागच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी हेलपाटे मारावे लागले. या वेळी फक्त अंगठा दिला आणि काम झाले. या वेळची प्रक्रिया अगदी सुटसुटीत आहे. 
- महादेव भिकू पाटील, शेतकरी, निगडी-म्हसळा 

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 25 शेतकरी कामानिमित्त मुंबईत असतात. होळीच्या सुटीत शेतकरी गावी आल्यावर पूर्तता होईल. ई-सेवा केंद्राच्या समन्वयाने बॅंक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत समन्वय साधावा. आधार प्रमाणिकरण करून घेणे जरूरीचे आहे. 
- के. टी. भिंगारे, निवासी नायब तहसीलदार, म्हसळा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT