मुंबई

Mumbai Air Quality : ...म्हणून मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली; महत्त्वाच्या भागातील AQI जाणून घ्या

संतोष कानडे

मुंबईः मागच्या महिन्याभरापासून मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळलेली आहे. परंतु कालपासून हवेचा AQI सुधारल्याचं दिसून येतंय. त्याचं कारण आहे पाऊस. मागच्या तीन दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली. रविवारी मुंबईतदेखील पाऊस कोसळला.

रविवारी नाशिक, मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. नाशिकच्या निफाडमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. नगरमध्येही पाऊस कोसळला. केवळ पाऊसच नाही तर गारपीटदेखील झाल्याचं बघायला मिळत आहे.

अवकाळी पावसामुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता मात्र सुधारली आहे. मुंबईतील बीकेसी वगळता सर्व भागातील AQI 100 च्या खाली गेलाय तर बीकेसीचा AQI 103 इतका आहे. पुढील तीन ते चार दिवस हवेची गुणवत्ता चांगल्या स्थितीत राहणार असल्याची माहिती आहे. सोमवारीही मुंबईत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.

कोणत्या भागात हवा सुधारली

  • कुलाबा - 76

  • भांडुप - 37

  • मालाड - 35

  • माझगाव - 47

  • वरळी - 33

  • बोरिवली - 65

  • बीकेसी - 103

  • चेंबूर - 89

  • अंधेरी - 67

  • एकूण मुंबई - 60 AQI

  • नवी मुंबई - 53

हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असावा?

  • शून्य ते ५० एक्यूआय - उत्तम

  • ५० ते १०० एक्यूआय - समाधानकारक

  • १०१ ते २०० एक्यूआय - मध्यम

  • २०१ ते ३०० एक्यूआय - खराब

  • ३०१ ते ४०० एक्यूआय - अतिशय खराब

  • ४०१ ते ५०० एक्यूआय - गंभीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhilesh Yadav VIDEO : "दिवे अन् मेणबत्त्यांवर पैसा का खर्च करायचा?, ‘ख्रिसमस’ मधून शिका" ; अयोध्या दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येस अखिलेश यादव यांचं वादग्रस्त विधान!

Bus Accident :भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटले अन् बस खडकावर आदळली, १५ जणांचा मृत्यू

Air India flight malfunction : 'एअर इंडिया'च्या विमानात बिघाड; सणासाठी निघालेले २५५ भारतीय अडकले परदेशात!

AUS vs IND: ऑस्ट्रेलियाचा प्लॅन झाला! भारताचा सामना करण्यासाठी पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी

Boat Capsizes: दुर्दैवी! १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारी बोट उलटली, ३ जणांचा मृत्यू, तर...; घटनेनं हळहळ

SCROLL FOR NEXT