मुंबई

रायगड जिल्हातील पावसाने शेतकरी वर्ग सुखावला; भातलावणीच्या कामांना वेग

महेंद्र दुसार - सकाळ वृत्तसेवा


अलिबाग : रायगड जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू झालेली पावसाची रिपरीप सुरूच आहे. यात शुक्रवारी दुपारी पावसाने थोडीशी उसंत घेतली होती. दमदार पडणाऱ्या पावसाने भाताच्या लावणीची कामे वेगाने सुरू आहेत.

मान्सून सुरू झाल्यापासून शुक्रवार (ता. 17) सकाळपर्यंत 1275.56 मिमी इतका पाऊस पडला आहे. सर्वाधिक पावसाची नोंद श्रीवर्धन तालुक्यात (1977 मिमी) इतकी झाली आहे, तर सर्वांत पावसाची कमी सरासरी खालापूर तालुक्यात (922) नोंदवली गेली आहे. ऐन लावणीच्या हंगामात सुरू झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांनी लॉकडाऊनमध्येही भात लावणीला प्राधान्य दिले आहे. रायगडमधील सत्तर टक्के भातलावणीची कामे पूर्ण झाली आहेत. या वर्षी लॉकडाऊन आणि अनेक शेतकरी गावाकडे आलेले असल्याने भात लावणीसाठी भासणारी मजुरांची उणीव जाणवत नाही. उर्वरित भातलावणी पुढील आठवडाभरात पूर्ण होईल, असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. खाडीलगतच्या खाचरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने येथील शेतकरी पाऊस कमी होण्याची वाट पाहत आहेत. 

नागली पिकाची पन्नास टक्के लावणी झाली आहे, तर भातपिकाची लावणी साठ टक्के पूर्ण झाली आहे. सध्या पाऊस रात्रीचा पडतो, तर दिवसा याचे प्रमाण कमी असते. यामुळे शेतकऱ्यांना लावणी करण्यास सोईचे पडत आहे.
- पांडुरंग शेळके,
जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे  )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांनी 'सुपर डान्सर चॅप्टर ५' मध्ये आदितीला दिला खास पाठिंबा

SCROLL FOR NEXT