मुंबई

मोदींचा मानसिक पराभव झाला; म्हणूनच ते निरुत्तर आहेत : राज ठाकरे

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : पाच वर्षांत एकही पत्रकार परिषद न घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहांसोबत पत्रकार परिषदेला हजेरी लावली, हा त्यांचा मानसिक पराभव असून, पंतप्रधानांची ही पत्रकार परिषद म्हणजे "मौन की बात' ठरल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीत मोदी-शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल करणाऱ्या राज ठाकरेंनी आजही या दोघांना लक्ष्य केले. पत्रकारांच्या प्रश्‍नांना उत्तर द्यायची हिंमत मोदी यांच्यात नसल्याचे त्यांच्या पत्रकार परिषदेत दिसले. अमित शहा यांनाच पत्रकार परिषदेत बोलायचे होते, तर मोदी तिथे बसलेच होते कशाला, असा सवाल करीत पाच वर्षांत मोदी यांनी असे काय केलेय, की ते प्रश्‍नांना घाबरतात? असा टोलाही राज यांनी लगावला. 

मागील पाच वर्षे मोदी स्वत:च बोलत आहेत. लोकांच्या प्रश्‍नांना उत्तर देण्यास ते घाबरतात. "मन की बात' करून ते स्वत:च्या मनातले सांगत आले. पण, आता पत्रकार व जनतेच्या प्रश्‍नांना त्यांच्याकडे उत्तरे नाहीत, हे पत्रकार परिषदेत दिसल्याचे राज म्हणाले. 

प्रत्येक प्रश्‍नाला पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे हात दाखवून मोदी निरुत्तर होत होते. हा त्यांचा मानसिक पराभव आहे. दादागिरी करणाऱ्या मोदी, शहा यांना आता दादागिरी काय असते, ते समजले असेल, अशी टीकाही राज यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

सायबर फ्रॉडपासून बचावासाठी ‘ही’ पंचसूत्री लक्षात ठेवाच! अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, नाहीतर रिकामे होईल बॅंक खाते; सोलापूर शहर सायबर पोलिस म्हणतात...

Uddhav Thackeray Statement : ''मुंबईत अ‍ॅनाकोंडा येऊन गेला अन् भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची'' ; उद्धव ठाकरेंचं विधान!

Swargate News : एसटीला ‘लाडकी बहिणच’ नकोशी! बससेवेत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर भेदभाव

SIR प्रक्रियेच्या १२ राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचे नाव का नाही? निवडणूक आयोगाने थेट उत्तरच दिले!

SCROLL FOR NEXT