mumbai police
mumbai police 
मुंबई

मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत रजनीश सेठ यांचे नाव आघाडीवर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - सध्या राज्याच्या राजकारणात सचिन वाझे प्रकरणामुळे एकच खळबळ माजली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने सचिन वाझेना स्कॉर्पियो कारमधील स्फोटक प्रकरणात अटक केल्यामुळे पोलीस दल आणि राज्य सरकारच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. काही महत्त्वाच्या पदांवर फेरबदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. काल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदावरुन हटवण्यात येईल अशी चर्चा होती. पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, असा कोणाताही प्रस्ताव आमच्याविचाराधीन नाही हे स्पष्ट केलं. 

आता मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सचिन वाझे प्रकरणाचा फटका बसेल, असं बोललं जात आहे. परमबीर सिंह यांना पदावरुन दूर केलं जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.  

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदासाठी वेगवेगळी नाव चर्चेत आहेत. यात रजनीश सेठ यांचे नाव आघाडीवर आहे. 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले रजनीश सेठ शांत स्वभावाचे आहेत. या पूर्वी रजनीश सेठ यांनी मुंबईच्या सहआयुक्त पदी अडीच वर्ष काम केंल आहे. त्यावेळी त्यांच्यावर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी देण्यात आली होती. आझाद मैदान हिंसाचारावेळीही ते सहआयुक्त होते. या पूर्वी राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक होते. रजनीश सेठ हे फोर्स वनचेही प्रमुख होते. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्यामध्ये एका तास चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT