Uddhav Thackeray 
मुंबई

Uddhav Thackeray : "भाजपनं हिंदुंची माफी मागितली पाहिजे"; राणेंच्या शंकराचार्यांवरील विधानावरुन ठाकरे आक्रमक

राणेंनी शंकराचार्यांवर टिप्पणी केल्यानंतर पुन्हा घुमजाव केलं आहे. पण यावरुन त्यांना टिकेला सामोरं जावं लागतं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : नारायण राणे यांनी नुकतीच शंकराचार्यांवर एक टिप्पणी केली होती. यावरुन शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी त्यांवर हल्लाबोल केला आहे. भाजप यांना पक्षातून काढून का टाकत नाही? असा सवाल करत याप्रकरणी भाजपनं हिंदुंची माफी मागितली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Ram Temple BJP should apologize to Hindus says Uddhav Thackeray aggressive over Narayan Rane statement on Shankaracharya)

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की, बाबरी किंवा राम मंदिराच्या लढ्यात शिवसेनेचं योगदान काय? तुम्ही तेव्हा हाफपँटमध्ये होतात. त्यानंतर आज सुक्ष्म आणि लघू म्हणाले की शंकराचार्यांचं हिंदुत्वामध्ये योगदान काय? लाज नाही वाटतं? एकतर स्वतःचे फोटो छापता मोदी सरकारची गॅरंटी. तुम्हाला शंकराचार्यांचा मान राखायचा नसला तरी शंकराचार्यांचा हिंदुत्वात योगदान काय असं विचारता? आणि तुमच्याशी आम्ही हिंदुत्वासाठी युती करु.

पण आम्ही कुठे काय म्हटलं की लगेच अपमान अपमान बोंबलता. मग माझं आज जाहीर त्यांना आवाहन आहे की, त्यांनी राम मंदिराच्या लोकार्पणाआधी हिंदुंची माफी मागावी. कारण शंकराचार्य आले तर तिथं त्यांचे फोटो लागणार माझे फोटो कसे येणार? त्यांचा मानसन्मान ठेवता येत नसेल तर तुम्ही त्यांचं योगदान विचारता तर तुमची लायकी काय?

म्हणून राम मंदिराचं उद्घाटन होताना भाजप यांना काढणार आहे की नाही? कारण हे सुद्धा गद्दारच आहेत. पण शंकाराचार्यंचं योगदान विचारण्यापूर्वी भाजपनं पहिली हिंदूंची माफी मागितली पाहिजे. कारण राम मंदिराचं लोकार्पण होतंय तर आम्ही देखील त्यात सहभागी आहोत आम्हाला सुद्धा आनंद आहे. आम्ही अपशकुनी नाही आहोत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर आणि भाजपवर हल्लाबोल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atal Setu EV Toll Waiver : इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर आजपासून टोलमाफी; पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आणि 'समृद्धी' वरही दोन दिवसांत लागू

Chandrakant Patil : व्हिजन ठेवल्यास समाजाचा सर्वांगीण विकास, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला; ‘सकाळ प्लस स्टडीरूम’च्या ई-पेपरचे प्रकाशन

Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांच्या काळात कॉफी खरंच होती का? डच पाहुण्यांना नेमका कसा केला होता पाहुणचार?

शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! 'सातारा जिल्ह्यातील शंभर हेक्टरवरील पिकांना फटका': अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान

Satara child health: 'साताऱ्यात लहान मुलांमध्ये वाढले संसर्गजन्य आजार'; सर्दी, खोकला, ताप, जुलाबाचे रुग्ण

SCROLL FOR NEXT