मुंबई

वाशिंद रेल्वे पुलाचा अहवाल सादर

किशोर कोकणे

ठाणे : वाशिंद रेल्वे पुलाखाली पाणी साठल्यानंतर शहापूर, कल्याण आणि मुरबाड तालुक्‍यातील तब्बल 42 गावांचा संपर्क तुटत असल्यामुळे या पुलाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने "आयआयटी-मुंबई'ला दिले होते. त्यानुसार आयआयटी-मुंबईने नुकताच उच्च न्यायालयात या संबंधी अहवाल सादर केला आहे. या अहवालात आयआयटी-मुंबईने काही उपाययोजनाही सुचविल्या आहेत. 

वाशिंद रेल्वेस्थानकाजवळ ब्रिटीशकालीन रेल्वे पुलापासून काही किलोमीटर अंतरावर असलेले भातसा धरण पूर्ण भरल्यानंतर आणि नाल्यांचा प्रवाहामुळे या पुलाखाली प्रचंड पाणी साठते. त्यामुळे पुलाखालून होणारी वाहतूक बंद करण्यात येते. तर, दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकाजवळ असलेले फाटक अपघात टाळण्यासाठी 20 वर्षांपासून बंद केले आहे. पुलाखाली साठलेले पाणी आणि रेल्वे फाटक बंद असल्याने प्रत्येक पावसाळ्यात येथील तब्बल 42 गावांचा संपर्क तुटतो. याप्रकरणी काही वर्षांपूर्वी स्थानिक संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय सुरळके यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर नवीन पूल बांधण्याचे; तसेच प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग देण्याचे आदेश न्यायालयाने रेल्वे आणि राज्य सरकारला दिले होते. मात्र, रेल्वे आणि राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे न्यायालयाने आदेश देऊनही पर्यायी मार्ग तयार झाला नाही. 

आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी गेल्या तीन महिन्यांतील राज्य सरकार, रेल्वे प्रशासन यांच्या बैठकींचा आढावा, पाणी तुंबण्याची कारणे, रेल्वे पुलाची कमी होत असलेली उंची अशा विविध नोंदी सादर केलेल्या अहवालात केल्या आहेत. 

सुचविलेल्या उपाययोजना 

- अनेक महिन्यांपासून रेल्वे पुलाजवळ उड्डाणपूल उभारण्यासाठी खोदकाम सुरू आहे. रेल्वे पुलाचे काम शक्‍य तितक्‍या लवकर पूर्ण करणे. 
- रेल्वे पुलाच्या पूर्व आणि पश्‍चिम रस्त्याशेजारी पाण्याचा निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी मार्ग तयार करणे. तसेच, या मार्गाची रुंदी 9 मीटर आणि खोली 1.5 मीटर इतकी किंवा त्यापेक्षा जास्त करणे. 
- रेल्वे पुलाखाली साठलेले पाणी उपसण्यासाठी व्यवस्था करणे. 
- रेल्वे पुलाखालील जागा कचरामुक्त करणे; तसेच पुलामध्ये होणारी गळती कमी करणे. 
- रेल्वे पुलाखाली साठणाऱ्या पाण्याची पातळी मोजण्याची व्यवस्था करणे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT