मुंबई

रिपब्लिक टीव्हीच्या वार्तांकनाने न्यायालयाचा अवमान? संस्थेला कायदेशीर नोटीस

- सुनीता महामुणकर

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यावर रिपब्लिक टीव्हीवर केलेल्या आक्षेपार्ह वार्तांकनामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे, असा आरोप करणारी कायदेशीर नोटीस एका वकिलाने रिपब्लिकला पाठवली आहे.

उच्च न्यायालयाने दिलेला जामीन नाकारण्याचा निकाल हा या प्रकरणाच्या गुणवत्तेवर आधारित होता. मात्र या निकालाचे वार्तांकन करताना त्याला राजकीय रंग देण्यात आला, असे या नोटीसीमध्ये म्हटले आहे. उच्च न्यायालयात वकिली करणारे एड सैफ आलम यांनी रिपब्लिक मिडिया नेटवर्कलाही नोटीस बजावली आहे. 
उच्च न्यायालयातील सुनावणी आणि निकाल हा गोस्वामी यांच्या विरोधातील कारस्थान आहे, असे विधान एंकरने केले होते. तसेच गोस्वामी यांना कारागृहात टाकण्याच्या कारवाईत न्यायालय सहभागी होते, अशा स्वरूपाची विधाने करण्यात आली होती. याबाबत संबंधित व्रुत्तवाहिनीने त्यांच्या चैनलवरच जाहीर माफी मागावी, अशी मागणी आलम यांनी नोटीसीमध्ये केली आहे.

न्यायालयाचा निकाल नकारात्मक पद्धतीने आणि चुकिच्या प्रकारे व्यक्त करून जनमानसात न्यायालयाची आणि न्यायमूर्तींची प्रतिमा डागाळण्याचे प्रयत्न केले, त्यामुळे संबंधित चैनलने माफी मागावी अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका दाखल करु, असा इशारा दिला आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सात दिवस गोस्वामी अलिबाग पोलिसांच्या कोठडीत होते.

Republic TV coverage of contempt of court? Legal notice to the organization

=--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT