माणगाव : संततधारेमुळे भातपीक पिवळे पडत आहे. 
मुंबई

बहरलेल्या भातपिकाला ग्रहण

सकाळ वृत्तसेवा

माणगाव (बातमीदार) : जून महिन्याच्या १५ तारखेपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार सप्टेंबर महिना सुरू झाला, तरी कायम आहे. जिल्ह्यात सर्वत्र आठ ते १० दिवस उशिराने सुरू झालेल्या पावसाने भातपिकाची लावणीची कामे वेळेत पूर्ण केली. मात्र, गेली अडीच महिने पावसाने संततधार सुरूच ठेवली आहे.

सतत पडणारा पाऊस व पूरसदृश्‍य स्थिती यामुळे तालुक्‍यातील भातशेती सतत पाण्याखाली आहे. सुरुवातीच्या चांगल्या पावसामुळे लावणीची कामे जून महिन्यात पूर्ण झाली होती; मात्र त्यानंतरही पाऊस कायम राहिल्याने भाताच्या रोपांची वाढ झाली नाही. दोन महिन्यानंतर लोंबीत येणारी भातपिकाची रोपे सततच्या पावसामुळे मुरझली असून पिवळी पडली आहेत. परिणामी, भाताचे पीक संकटात असल्याने शेतकरी चिंतीत झाले आहेत. यापुढेही असाच पाऊस सुरू राहिल्यास भाताच्या लोंबींना पळज निर्माण होऊन पिकांचे पूर्ण नुकसान होणार आहे. संततधार पावसाने भाजी पीक व मिरची आदी पिकांचे पूर्ण नुकसान केले असताना हाती आलेले भातपीकही नुकसानीत जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावर सरकारने काहीतरी तोडगा काढावा, असे शेतकरी सांगत आहेत.

या कालावधीत भातपिकांना ऊन, वारा आवश्‍यक असतो. लोंबींना बहर येतानाच संततधार सुरू असल्याने भातशेती तोट्यात जाणार आहे. मिरची व इतर पिकांचे नुकसान झाले असताना भातपीकही वाया जात आहे. सरकारने याची दखल घ्यावी.
- नारायण मोंडे, शेतकरी, माणगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT