माणगाव : संततधारेमुळे भातपीक पिवळे पडत आहे. 
मुंबई

बहरलेल्या भातपिकाला ग्रहण

सकाळ वृत्तसेवा

माणगाव (बातमीदार) : जून महिन्याच्या १५ तारखेपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार सप्टेंबर महिना सुरू झाला, तरी कायम आहे. जिल्ह्यात सर्वत्र आठ ते १० दिवस उशिराने सुरू झालेल्या पावसाने भातपिकाची लावणीची कामे वेळेत पूर्ण केली. मात्र, गेली अडीच महिने पावसाने संततधार सुरूच ठेवली आहे.

सतत पडणारा पाऊस व पूरसदृश्‍य स्थिती यामुळे तालुक्‍यातील भातशेती सतत पाण्याखाली आहे. सुरुवातीच्या चांगल्या पावसामुळे लावणीची कामे जून महिन्यात पूर्ण झाली होती; मात्र त्यानंतरही पाऊस कायम राहिल्याने भाताच्या रोपांची वाढ झाली नाही. दोन महिन्यानंतर लोंबीत येणारी भातपिकाची रोपे सततच्या पावसामुळे मुरझली असून पिवळी पडली आहेत. परिणामी, भाताचे पीक संकटात असल्याने शेतकरी चिंतीत झाले आहेत. यापुढेही असाच पाऊस सुरू राहिल्यास भाताच्या लोंबींना पळज निर्माण होऊन पिकांचे पूर्ण नुकसान होणार आहे. संततधार पावसाने भाजी पीक व मिरची आदी पिकांचे पूर्ण नुकसान केले असताना हाती आलेले भातपीकही नुकसानीत जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावर सरकारने काहीतरी तोडगा काढावा, असे शेतकरी सांगत आहेत.

या कालावधीत भातपिकांना ऊन, वारा आवश्‍यक असतो. लोंबींना बहर येतानाच संततधार सुरू असल्याने भातशेती तोट्यात जाणार आहे. मिरची व इतर पिकांचे नुकसान झाले असताना भातपीकही वाया जात आहे. सरकारने याची दखल घ्यावी.
- नारायण मोंडे, शेतकरी, माणगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

Shilpa Shetty Latest News : शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढल्या! , आता मुंबईतील घरावरही 'आयकर' विभागाची छापेमारी

SCROLL FOR NEXT