Mumbai Police esakal
मुंबई

Mumbai Curfew : मुंबईत कर्फ्यू; कशाला, का आणि कधी? जाणून घ्या नेमकं कारण

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत कलम 144 लागू करण्याची अचानक घोषणा करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत कलम 144 लागू करण्याची अचानक घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत कलम 144 लागू करण्याची अचानक घोषणा करण्यात आली आहे. शहरात शांतता राहावी आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 4 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत शहरात कलम 144 लागू केलं आहे.

यादरम्यान एकाच ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येण्यासही बंदी घालण्यात आलीय. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, 4 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2023 या कालावधीत शहरात शस्त्रं, फायर आर्म्स, तलवारी आणि इतर शस्त्रं बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. एवढंच नाही तर यावेळी घोषणाबाजी, निदर्शनं आणि सार्वजनिक ठिकाणी गाणी सादर करण्यासही बंदी घातली आहे.

2 जानेवारीपर्यंत मुंबईत कशावर असणार बंदी?

  • लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड वाजवण्यास आणि फटाके फोडण्यास मनाई असेल.

  • सर्व प्रकारचे विवाह समारंभ, अंत्यसंस्कार शोकसभा, कंपन्या, क्लब, सहकारी संस्था आणि इतर संघटनांच्या मोठ्या प्रमाणावर सभा घेण्यास मनाई असेल.

  • सरकारी कार्यालये, न्यायालये आणि सरकारी किंवा निमशासकीय काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आसपास 5 किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी.

  • क्लब, चित्रपटगृहे किंवा सार्वजनिक मनोरंजनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकत्र येण्यास मनाई. नाटकं किंवा संमेलनावर बंदी.

  • शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये उपक्रमांसाठी सभा घेण्यासही बंदी घालण्यात आलीय.

  • कारखान्यांच्या सामान्य कामकाजासाठीही सभांना बंदी घालण्यात आली आहे.

  • दुकानं, आस्थापना किंवा व्यवसाय-संबंधित बैठका आणि मेळाव्यावर बंदी असणार आहे.

या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असं मुंबई पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलंय.

CrPC चं कलम 144 काय आहे?

CrPC अंतर्गत कलम-144 लागू करण्याचा उद्देश म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता समाजात शांतता व सुव्यवस्था राखणं हा आहे. परिस्थिती पाहता, डीएम किंवा जिल्हाधिकारी कलम 144 लागू करण्यासाठी अधिसूचना जारी करतात. जिथं कलम 144 लागू आहे, तिथं चार किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र जमू शकत नाहीत. त्याच वेळी, ज्या राज्यांमध्ये पोलिस आयुक्त यंत्रणा आहे, तिथं पोलिस उपायुक्तांना (DCP) कलम 144 लागू करण्याचा अधिकार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB WPL 2026 : जॅकलिनचा डान्स, हनी सिंगचा धमाका; हवा केली ‘त्या’ तरुणीने! कोण आहे Harnaaz Kaur Sandhu?

Municipal Election: भिवंडीचे राजकारण अडकलं बिगर-मराठी मतदारांच्या कौलात; शेवटच्या क्षणीही सस्पेन्स कायम!

Latest Marathi News Live Update : सर्व भाजपचे एजंट आहेत - आझमी

Stray Dogs Issue: शिक्षकांना भटके कुत्रे पकडण्याचे आदेश; शिक्षण विभागाचे अजब फर्मान, सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Municipal Election 2026 : अमरावतीत प्रचाराला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न? अनिल बोंडेंच्या 'त्या' दाव्यानं राजकारण तापलं, संजय खोडकेंचंही प्रत्युत्तर...

SCROLL FOR NEXT