Mumbai Rain Updates esakal
मुंबई

Mumbai Rain: मुंबईत पहिल्याच पावसांत दुर्घटनांची मालिका; दोन दिवसांत सहा जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुंबईत शनिवारपासून सुरु झालेल्या पावसात दुर्घटनांची मालिका सुरु असून गेल्या दोन दिवसांत सहा जणांचा मृत्यू झाला आला आहे. यात घाटकोपर व विलेपार्ले या दोन ठिकाणी इमारतीचा भाग कोसळून व गोवंडी येथे ड्रेनेज लेनमध्ये गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पहिल्याच पावसांत सलग झालेल्या या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबईत लांबलेल्या पावसाने जून संपता संपता गेल्या शनिवारपासून दमदारपणे बरसण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी व रविवारी सलग दोन दिवस जोरदार कोसळलेल्या या पावसांत पडझडीच्या घटना घडल्या असून यात सहा जणांना जीव गमवावा लागला आहे.

शनिवारी पहिल्या दिवशी गोवंडीत ड्रेनेज लेनमध्ये उतरलेल्या दोन कामगारांचा विषारी वायुमुळे गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. तर रविवारीही पावसाने बॅटिंग सुरुच ठेवली होती. मुंबई शहर व उपनगरांत जोरदार पाऊस कोसळला. या दिवशी घाटकोपर येथील तीन मजली इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत इमारतीच्या ढिगा-याखाली पाचजण अडकले होते.

अग्निशमन दलाने युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेऊन यातील तीन जणांची सुखरुप सुटका केली. मात्र दोघांचा शोध सुरु होता. अखेर सोमवारी सकाळी २४ तासानंतर या दोघांचे मृतदेह सापडले. तर रविवारी विलेपार्ल्यातही एका इमारतीचा भाग कोसळून दोघांना जीव गमवावा लागला.

रविवारी एकाच दिवशी इमारत कोसळण्याचा दोन घटनांत चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पहिल्याच पावसांत सलग घडलेल्या या दुर्घटनांमुळे सुरक्षेच्यादृष्टीने चिंता व्यक्त केली जाते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT