sharad pawar ajit pawar gives reason for not sending support letter to shivsena
sharad pawar ajit pawar gives reason for not sending support letter to shivsena 
मुंबई

म्हणून राष्ट्रवादीनं पाठिंब्याचं पत्र दिलं नाही; पवारांचा खुलासा 

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादी-शिवसेना यांनी यापूर्वी एकत्र कधी सरकार चालवलेलं नाही. त्यामुळं बऱ्याच गोष्टी आहेत. त्याची स्पष्टता व्हायला हवी. आम्ही काँग्रेससोबत निवडणूक लढवली होती. त्यामुळं सरकार स्थापने संदर्भात जो काही निर्णय घ्यायचा आहे तो काँग्रेसशी चर्चा करूनच घेऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी आज सकाळी सांगितले. सिल्वर ओक निवासस्थानी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी काल राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र का दिलं नाही, यावरही अजित पवार यांनी यावेळी खुलासा केला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही 'मी पहिल्यांदा काँग्रेसशी बोलेन,' असं स्पष्ट केलंय. 

काँग्रेसशी चर्चा करूनच निर्णय 
अजित पवार म्हणाले, 'काँग्रेस-राष्ट्रवादीने 15 वर्षे सरकार चालवले. त्यावेळी आमच्यात अंडरस्टँडिंग होतं. शिवसेना आणि राष्ट्रवादी पहिल्यांदा सरकार स्थापन करत आहेत. त्यामुळं अनेक बाबींवर आधीच चर्चा व्हायला हवी. दोन्ही पक्षांनी एकत्र कधीच काम केलेलं नाही. तसच आम्हाला काँग्रेसशीही बोलावं लागेल. किमान समान कार्यक्रम ठरवावा लागले आणि त्यानंतरच सत्ता स्थापनेची सूत्र पुढं सरकतील. स्थिर सरकार चालवायचं असेल तर, हे करावं लागेल कारण, मतदार प्रश्न विचारतील. मुळात सरकार म्हणजे, सोपी गोष्ट नाही अनेक मुद्दे असतात. खाती कशी चालतील विभाग कसे चालतील. या सगळ्याचा विचार करायला लागतो. पण, काँग्रेसशी चर्चा केल्यानंतर जे काही निष्पन्न होईल तो आमचा निर्णय असेल.'

राष्ट्रवादीनं का पत्र दिलं नाही? 
राष्ट्रवादी काँग्रेसनं काल शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र का दिले नाही? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर अजित पवार म्हणाले, 'काल संध्याकाळी आम्हीही काँग्रेसच्या पत्राची वाट पाहत होतो पण, काँग्रेसनं पत्र दिलं नाही. त्यामुळं आमचं पत्र देऊनही काही झालं नसतं. आम्हाला या सगळ्या विषयावर काँग्रेसशी चर्चा करण्यासाठी वेळ हवा होता. काँग्रेस नेते जयपूर, दिल्लीत असल्यामुळे ही चर्चा होऊ शकली नाही. आज, आमची संयुक्त बैठक होईल त्यानंतर संपूर्ण निर्णय आम्ही जाहीर करू.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT