Sharad Pawar Vashi Navi Mumbai Esakal
मुंबई

Sharad Pawar: "शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारेच महाराष्ट्राच्या एकात्मतेला धोका," शरद पवारांचा हल्लाबोल

Navi Mumbai Aikya Parishad: यामध्ये पवार यांनी सध्या देशातील तसेच राज्यातील बघडलेल्या समाजिक परिस्थितीवर भाष्य केले.

आशुतोष मसगौंडे

नुकतेच नवी मुंबई येथे एकता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे होते. यामध्ये पवार यांनी सध्या देशातील तसेच राज्यातील बिघडलेल्या समाजिक परिस्थितीवर भाष्य केले. याचबरोबर "शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारेच महाराष्ट्राच्या एकात्मतेला धोका," असा थेट हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

यावेळी बोलताना शरद पवारांनी शिवाजी महाराज आणि त्यांनी समाजिक एकतेसाठी केलेले काम याबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले, "या देशात आजपर्यंतच्या काळात अनेक राजे होऊन गेले. पण आज 350 वर्षांनंतरही त्यांनी केलेल्या कार्याचा कुठे उल्लेख आला तर शिवाजी महाराजांचे नाव पहिल्या स्थानी असते. देशात यादव आणि मुघल राजे होऊन गेले. त्यांची राज्ये त्यांच्या नावाने ओळखली जायची. पण शिवाजी महाराजांचे राज्य भोसलेंच्या नावाने नाही तर रयतेचे राज्य आणि हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखले गेले."

पुढे बोलताना पवार म्हणाले, "महाराष्ट्र हे रयतेचे राज्य असल्याचे शिवाजी महाराजांनी त्यांच्या कृतीतून दाखवले. जेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका संदर्भातील प्रश्न आता तेव्हा स्थानिक समाजातील काही लोकांनी हा अभिषेक करण्यासाठीही नकार दिला. शेवटी उत्तरेकडून कोणालातरी आणावे लागले आणि अभिषेक करावा लागला. याचा अर्थ असा की, त्या कालखंडातही ऐक्याला धक्का देणारा एक वर्ग समाजामध्ये होता. आणि दुर्दैवाने तो आजही कुठे ना कुठे पाहायला मिळतोय."

दि.मंगेश आमले इनिशेटिव्ह यांच्या वतीने नवी मुंबई येथे देशातील पहिल्या सामाजिक ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे अध्यक्षपद शरद पवार यांनी भूषविले. यावेळी त्यांनी समाजातील वेगवेगळ्या घटकांना समानता व ऐक्य याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्या कार्याचाही उल्लेख केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT