Sanjay Raut esakal
मुंबई

Sanjay Raut : ‘भारत जोडो’ यात्रेत माणुसकी

संजय राऊतांकडून कौतुक; राजकारणात ओलावा सध्या दुर्मिळ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात ११० दिवस यातना दिल्याचे दु:ख वाटणे, हीच माणुसकी आहे. राजकारणात हा ओलावा संपला आहे. ‘भारत जोडो’ यात्रेत तो दिसतोय, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे कौतुक केले.

राहुल गांधी यांनी काल रात्री दूरध्वनी करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्विट करून दिली आहे. संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलेय, की ‘भारत जोडो’त व्यस्त असूनही राहुल गांधी यांनी रात्री दूरध्वनी करून माझ्या प्रकृतीची विचारपूस केली.

आम्हाला तुमची चिंता होती, असे ते म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात ११० दिवस यातना दिल्याचे दु:ख वाटणे, हीच माणुसकी आहे. सध्या राजकारणात वाढलेली कटुता पाहता अशी माणुसकी, ओलावा दुर्मिळ बाब बनली आहे. राहुल यांनी आपल्या यात्रेत प्रेम आणि करूणेवर लक्ष केंद्रित केले आहे.

त्यामुळे यात्रेला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी विरोधकांचाही चांगलाच समाचार घेतला. भाजपसह मनसेतील नेत्यांनी विचारपूस केली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Rahane चा अजित आगरकरच्या निवड समितीवर निशाणा; स्पष्ट शब्दात सांगितलं ऑस्ट्रेलियात टीम इंडियाला माझी गरज होती पण...

Saswad Heavy Rain: सासवड जेजुरी पालखी मार्ग जलमय; खळद, शिवरी येथे अर्धा तास मुसळधार पाऊस

IND vs SA Test Series: तो परत आला...! भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा; ३ फिरकीपटूंचा समावेश

Bacchu Kadu: जातीपातीच्या भांडणांमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न हरवला: बच्चू कडू; शेतकऱ्यांचा ‘आसूड मेळावा’; सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल

Latest Marathi News Live Update :निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपी बबलू सुरवसेला सांगलीतून अटक

SCROLL FOR NEXT