aditya Thackeray reaction on sanjay raut bail shivsena Maharashtra politics  e sakal
मुंबई

Sanjay Raut : शिवसेनेसाठी दहा वेळा तुरुंगात जायला लागलं तरी माझी तयारी - संजय राऊत

तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आमच्या शिवसेनेनं मला खूप काही दिलं आहे. त्यामुळं मला दहावेळा तुरुंगात जावं लागलं तरी माझी तयारी आहे, अशी भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडली आहे. तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते.

राऊत म्हणाले, "आम्ही कुटुंब आहोत त्यामुळं मी तुरुंगात गेलो कारण मला खात्री होती की उद्धव ठाकरे आणि वहिनी तसेच आदित्य माझ्या कुटुंबाची काळजी घेतील, त्या एका हिंमतीवर मी तुरुंगात गेलो. आमच्या मूळ शिवसेनेसाठी मला दहा वेळा जरी तुरुंगात जायला सांगितलं तरी मी जायला तयार आहे. कारण कधीतरी पक्षासाठी त्याग करण्याची वेळ येते. यासाठी जर माझ्यासारख्याची तयारी नसेल तर गेल्या चाळीस वर्षात पक्षानं मला जे भरभरुन दिलं त्याच्याशी ते कृतघ्नता ठरेल.

शिवसेनेचा महाराष्ट्रात एकच गट

बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत आणि आता आदित्यपर्यंतच हे महान नातं टिकलं पाहिजे. आम्ही कितीही मोठे झालो किती सर्वोच्चस्थानी पोहोचलो तरी पक्षाशी बेईमानी करणं चुकीचं आहे. मला सुटायचं, माझ्या पापापासून मुक्त व्हायचंय म्हणून मी आई मानतो त्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणं आमच्या रक्तात नाही. काल माझ्या सुटकेनंतर लोकांना जो आनंद झाला. हे सगळे शिवसैनिक आहेत ते अचानक रस्त्यावर आले मलाही माहिती नव्हतं. मला जेलच्या बाहेर जायला अडीच तास लागले. हे जे प्रेम आहे ते शिवसेनेवरचं प्रेम आहे. शिवसेना महाराष्ट्रात एकच आहे, गट वैगरे काही नाही. ज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत.

राज्य फडणवीसच चालवत आहेत

महाराष्ट्रातील राजकारणातील कटुता संपवावी असं विधान जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय ते महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळं मी त्यांना यासाठी भेटणार असं म्हटलंय की सध्या फडणवीसच राज्य चालवत आहेत, बाकीचे नुसतेच उंडारताहेत.

हेही वाचाः कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे?

महाराष्ट्रातील राजकारणातील कटुता संपवावी असं विधान जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय ते महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळं मी त्यांना यासाठी भेटणार असं म्हटलंय की सध्या फडणवीसच राज्य चालवत आहेत, बाकीचे नुसतेच उंडारताहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘हेरा फेरी’चा हिरो आता बिझनेसमन! सुनील शेट्टीने जावई आणि ल्योकासोबत उभारला नवीन व्यवसाय, महिलांसाठी खास वस्तू आणली बाजारात

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले, ७ मृत्युमुखी, २०० पेक्षा जास्त जखमी, भारतातही जाणवले धक्के

ICCपेक्षा BCCIकडून जास्त बक्षीस! भारतीय महिला संघासह सपोर्ट स्टाफ होणार मालामाल

DCB Bank Job : जिल्हा बँकांच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य, राज्य शासनाचा निर्णय; सत्तर टक्के जागा राखीव ठेवण्याचे आदेश

Nagpur Fake Teacher ID Scam: ६७२ बोगस शिक्षकांकडून होणार वेतनाची वसुली? सायबर पोलिस करणार न्यायालयात मागणी

SCROLL FOR NEXT