मुंबई

जाणून घ्या मुंबईत उभारणाऱ्या नव्या सागरी पुलाबद्दल

कृष्ण जोशी

मुंबई: वाहतुकीची वर्दळ असणाऱ्या दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून जलद प्रवासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नरिमन पॉईंट ते कुलाबा हा नवीन पूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी सल्लागारची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी दिली. मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी एमएमआरडीए अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. महानगरातील सेवा सुविधांसाठी प्राधिकरणाने सर्वंकष परिवहन अभ्यास 2005 - 2008 मध्ये लि.असोसिएट्स यांच्याकडून करून घेतला होता. या अहवालामध्ये नरिमन ते कुलाबा ह्यांना जोडणारा मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. 

सद्यस्थितीत नरिमन पॉईंट येथून कुलाब्याला जाण्याकरीता कॅप्टन प्रकाश पेठे हा एकमेव मार्ग अस्तित्वात आहे. सदर मार्गिकेमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मार्गेकेवरील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा प्रचंड वेळ वाया जात आहे. त्यानुसार दक्षिण मुंबईत होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्राधिकरणाने नरिमन पॉईंट ते कुलाबा नवीन पुल प्रकल्पांचे काम हाती घेतले आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावून नागरिकांना सुखद आणि जलद प्रवासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने नरिमन पॉईंट ते कुलाबा हा नवीन पुल प्रकल्प बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

सदर पुलाची लांबी ही 1.6 किलो मीटर असून या प्राधिकरणामार्फत या प्रकल्पासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. या सल्लागारामार्फत प्रकल्पाचे आरेखन, मार्गिका, विविध प्रकारचे वाहतूक सर्वेक्षण ,प्रकल्पाची अंदाजे रक्कम, अंमलबजावणीची योजना तसेच आवश्यक सर्व परवानग्या आदी बाबत सखोल अभ्यास करण्यात येणार असून 4 महिन्यात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्टे आहे.

प्रकल्पाबाबत बोलताना आर.ए.राजीव, महानगर आयुक्त, एमएमआरडीए म्हणाले, ''नरिमन पॉईंट ते कुलाबा नवीन पूल प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नसून याची सर्वोतोपरी काळजी घेण्यात येईल. तसेच त्यांच्या बोटी ये-जा करता कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊनच सदर पुलाची संरचना करण्यात  येणार आहे. तसेच समुद्रातील जैविकतेचा अभ्यास देखील सदर सल्लागारकडून करण्यात येणार आहे. नरिमन पॉईंट ते कुलाबा नवीन पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.

--------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

South Mumbai MMRDA plan built Nariman Point to Colaba sea link

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT