मुंबई

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना रेल्वेकडून मोठा दिलासा; दहा डिसेंबरपर्यंत करता येणार लोकल प्रवास

प्रशांत कांबळे

मुंबई : दहावी-बारावीच्या परिक्षेत अपेक्षित यश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षांकरिता 10 डिसेंबरपर्यंत उपनगरीय लोकलमधून विद्यार्थ्यांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अपेक्षित यश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा शुक्रवारपासून सुरू झालेली आहे. मात्र मुंबई उपनगरात परीक्षा केंद्रावर पोचण्यासाठी विद्यार्थ्यांना वाहतूक व्यवस्था अपुरी पडत असल्यामुळे आणि परीक्षा केंद्रावर वेळेवर करिता विद्यार्थी आणि पालकांकडून उपनगरीय लोकल सेवेत प्रवेश देण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. यासबंधीत राज्य सरकारने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी लोकल सेवेत प्रवेश देण्याची मागणी रेल्वेकडे केली होती. 

या मागणीला प्रतिसाद देत मध्य आणि पश्चिम रेल्वेने येत्या 10 डिसेंबरपर्यंत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकलमधून प्रवस करण्याची मुभा देण्यात आली आहेत. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा ओळखपत्रावर रेल्वे स्थानकात प्रवेशन देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थांबरोबर पालकांना सुद्धा प्रवेश देण्यात येणार आहे.

याही बातम्या वाचा : 

SSC and HSC repeaters can travel from the local train for their exams

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : बंगळूर ते पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT