मुंबई

मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई; आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत कोरोनाचे रुग्ण घटत असले तरी पाश्‍चिमात्य देशात आलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर पुढील काही महिने यंत्रणांसोबतच नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करतानाच मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. दिवाळी आणि त्यानंतरचे 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. ज्यांचा नागरिकांशी कायमच संपर्क येतो असे विक्रेते, बसचालक, वाहक आदींची सातत्याने चाचणी करावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. 

कोरोनामुळे दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महानगरात घ्यावयाच्या दक्षतेबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. परिवहन मंत्री अनिल परब, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, महापालिका आयुक्त इक्‍बालसिंह चहल आदी त्यास उपस्थित होते. मुंबई महानगरात "माझे कुटुंब... माझी जबाबदारी' मोहीम यशस्वी राबवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. 
"नागरिकांची दिवाळी सुखाची जावी म्हणून आपण सर्वांनी सतर्कता बाळगत जनजागृतीच्या माध्यमातून कोरोनाचा धोका संपला नसल्याची जाणीव त्यांना करून द्यावी. प्रदूषण कमी झाले नाही तर कोरोनाचे संकट कायम राहील हे त्यांना पटवून द्यावे,' असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केले. रुग्णसंख्या कमी होत असल्याने नागरिकांमध्ये मास्क वापरण्याबाबत बेफिकिरी दाखवली जात आहे. मास्क वापरण्याबाबत मोहीम अधिक तीव्र करावी. कायद्याचा धाक दाखवतानाच जनजागृतीवर अधिक भर देऊन मास्क वापरण्याचे आवाहन करावे, असेही त्यांनी सांगितले. 

कोरोना उपचारासाठी जम्बो सेंटर सुरू करण्यात आली आहेत, त्यांची भविष्यात गरज भासू शकते. ते लक्षात घेऊन नियोजन करावे. जम्बो सेंटरची आवश्‍यक ती देखभाल-दुरुस्ती करून घ्यावी. औषधे उपलब्ध ठेवावीत. जम्बो सेंटरमधील कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचे नियोजन करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. 

जम्बो सुविधांची देखभाल-दुरुस्ती करा 
मुंबईत कोरोना उपचारासाठीच्या ज्या जम्बो सुविधा निर्माण केल्या आहेत, त्यांची देखभाल-दुरुस्ती करावी. जेणेकरून आगामी काळात गरज भासल्यास त्यांचा वापर करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत सांसर्गिक आजारांवरील उपचाराचे 5000 खाटांचे रुग्णालय करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. रुग्णालयाचे काम जनहित लक्षात घेऊन करा, अशी सूचनाही त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली. 

कारवाईसाठी अतिरिक्त मनुष्यबळ 
"माझे कुटुंब... माझी जबाबदारी' मोहिमेचा परिणाम मुंबईत कशा प्रकारे झाला याचा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस) संस्था अभ्यास करणार असल्याचे महापालिका आयुक्त इक्‍बालसिंह चहल यांनी सांगितले. कोरोनाच्या मोफत चाचण्यांसाठी मुंबईत सध्या 244 केंद्रे सुरू करण्यात आली असून दररोज 20 हजार चाचण्यांचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईसाठी अतिरिक्त मनुष्यबळ वाढवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT