Varsha Gaikwad Statement  sakal media
मुंबई

"आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास कारवाई"

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एखाद्या विद्यार्थ्याकडे आधार कार्ड (Aadhaar card) नाही म्हणून त्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. याबाबत तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी आज विधान परिषदेत दिली. शिक्षक आमदार नागो गाणार (Nago Ganar) व आमदार निरंजन डावखरे (Niranjan davkhare) यांनी आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांचे नाव संच मान्यतेच्या संख्या अहवालात गाळली जात असल्याची बाब प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केली होती.

आमदार गाणार यांनी यावेळी राज्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड संदर्भात करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती सभागृह समोर मांडली. शिक्षणाधिकारी मुख्याध्यापकांना तंबी देतात की, ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही, त्यांचे नाव शिक्षण विभागाच्या यादीत पाठवू नका. ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही, त्यांचे नाव हजेरी पटावरून कमी करा, असे सांगितले जाते. त्यावर वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिले.

आधार कार्ड नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. जे शिक्षणाधिकारी अशाप्रकारे विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचे काम करतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अशी माहिती गायकवाड यांनी दिली. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नाही, त्यांना ते काढून घेण्यासाठी सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT