मुंबई

चालकांनी नियम मोडल्यास दंडासह समुपदेशन कार्यशाळेत भाग घेण्याची सख्ती

रविंद्र खरात

कल्याण - रस्त्यावर वाहन चालविताना वाहन चालकांच्या बेशिस्तामुळे अपघात होतात आणि यावर उपाय म्हणून आरटीओ आणि वाहतुक पोलिसांमार्फत प्रबोधन आणि कारवाई होते. मात्र तरिही वाहन चालकांची बेशिस्तपणा काही कमी होत नसल्याने आता 1 डिसेंबर पासून कल्याण आरटीओ मार्फत बेशिस्त वाहन चालका विरोधात विशेष कारवाई सुरू होणार असून, दोषी वाहन चालकांवर कारवाई होणारच मात्र त्यापूर्वी त्याला आरटीओ मार्फत दोन तासांच्या रस्ते सुरक्षा विषयक नियमाच्या समुपदेशन कार्यशाळेत उपस्थित राहावे लागणार आहे.

कल्याण आरटीओ कार्यालय अंतर्गत डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर टिटवाळा बदलापूर ग्रामीण भागांचा समावेश होतो.  देशपातळीवर रस्त्यावरील अपघात पाहता सुप्रिम कोर्टाने चिंता व्यक्त करत रस्ता सुरक्षा समिती स्थापन केली होती राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर कठोर कारवाई बाबत आदेश देण्यात आले होते. 

मोटार वाहन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत विशेष भर देण्याच्या आदेशानुसार कल्याण आरटीओ मार्फत कारवाई ही करण्यात आली होती. वाहन चालविताना मोबाईल वापर, अतिवेगाने वाहन चालविणे, क्षमतेपेक्षा अधिक भराची वाहतूक, मद्य प्राशन करून वाहन चालविणे, चोरटी वाहतूक, सीट बेल्ट आणि हेल्मेट बाबत वाहतूक पोलिस सोबत कारवाई करण्यात आली. आता दोषी आढळ्यास आरटीओच्या 2 तासाच्या रस्ता सुरक्षा विषयक नियमांच्या समुपदेशन साठी उपस्थित राहावे लागणार असल्याने बेशिस्त वाहन चालकांची चांगलीच डोकेदुखी वाढणार आहे. 

लायसन्स निलंबन होणार 
1 ) विहित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे यात दोषी आढळल्यास 90 दिवस वाहन चालकांचे लायसन्स निलंबित होणार. 
2 ) सिग्नल तोडल्यास.. 90 दिवस वाहन चालकांचे लायसन्स निलंबित होणार. 
3 ) मालवाहू वाहनात मर्यादा पेक्षा जास्त वाहतूक केल्यास 90 दिवस वाहन चालकांचे लायसन्स निलंबित होणार. 
4 ) माल वाहनातून प्रवासी वाहतूक करणे 90 दिवस वाहन चालकांचे लायसन्स निलंबित होणार. 
5 ) दारू किंवा अंमली पदार्थ सेवन करून गाडी चालविल्यास 180 दिवस वाहन चालकांचे लायसन्स निलंबित होणार. 
6 ) वाहन चालविताना मोबाईल वापरल्यास 90 दिवस वाहन चालकांचे लायसन्स निलंबित होणार. 

या सहित दंड आणि यासोबत आता 1 डिसेंबर पासून 2 तासाचे समुपदेशन कार्यशाळा मध्ये सहभाग घ्यावा लागणार आहे. 

कल्याण आरटीओ कारवाई ...
एप्रिल 2018 ते ऑक्टोबर 2018 या कालावधीत कल्याण आरटीओ ने 1 हजार 808 वाहनाची तपासणी केली असून यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 214 वाहने दोषी आढळली तर यात 185 प्रकरणे निकाली काढली. 49 वाहने जप्त केली असून, माल उतरवून 215 वाहने परत दिली असून यात तडजोड शुल्क 3 कोटी 84 हजार 500 रुपये तर एकूण 3 कोटी 84 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आले आहे.

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देश नुसार उपाययोजना आणि कारवाई करून ही बेशिस्त वाहन चालक सुधारत नसल्याने 1 डिसेंबर पासून त्यांच्यावर कारवाई करताना त्यांना अगोदर 2 तास समुपदेशन रस्ता सुरक्षा विषयक देण्यात येणार असल्याची माहिती कल्याण आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT