मुंबई

मराठा आरक्षणासंदर्भात जाब विचारण्यासाठी विद्यार्थी मंत्रालयावर धडकणार; मराठा ठोक मोर्चांचा इशारा

तुषार सोनवणे

मुंबई - मराठा आरक्षणला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असताना, राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश आरक्षणाविना घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. गुरूवारी विद्यार्थ्यांचा मोर्चा मंत्रालयावर धडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे राज्यातील शैक्षणिक प्रवेश रखडले आहेत. त्यामुळे आरक्षणाविनाच म्हणजेच एसईबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना खुला प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात अनेक मराठा संघटना आक्रमक होताना दिसत आहे. 

सरकारच्या निर्णयाविरोधात मराठा ठोक क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. या सरकारवरील आमचा विश्वास उडाला असून आता न्यायासाठी मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल. मराठा आरक्षणासंदर्भात जाब विचारण्यासाठी राज्यभरातील विद्यार्थी मंत्रालयावर उद्या (गुरूवारी) मोर्चा काढणार असल्याचा इशारा क्रांती मोर्चाने दिला आहे.

Students at mantralay to ask for answers regarding Maratha reservation said Maratha Thok Morcha 

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेअर बाजाराला युद्धझळा! कच्चे तेल महागले, गॅसची टंचाई; रुपयाची घसरगुंडी, सोनं झालं स्वस्त

मोठी बातमी! ३ लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची होणार पडताळणी; ‘एसआयटी’ला ३ महिने मुदतवाढीचा प्रस्ताव; २,७९६ शिक्षकांची माहितीच मिळेना

Donald Trump Iran War Statement : युद्ध संपलंय... डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान, मात्र इराणे दिले हे प्रत्युत्तर

कर्जमाफीचा लाभ ३० जूनपूर्वीच! ...तरच ७/१२ उताऱ्यावरील कर्जाचा बोजा होईल कमी; सहकार विभाग सरकारला पाठविणार पात्र शेतकऱ्यांची माहिती, वाचा...

Satara Crime: साताऱ्यातील निवासी शाळेत २४ मुलांवर अत्‍याचार; केअरटेकरच्या प्रतापाने राज्यात खळबळ, मुले घाबरली अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT