Lok Sabha Election Sakal
मुंबई

Lok Sabha Election : ठाणे जिल्ह्यात ३५५ अर्ज वितरीत; १११ उमेदवारी अर्ज दाखल, २० अर्ज अवैध

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी २६ एप्रिल पासून अर्ज वितरीत व दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली.

सकाळ वृत्तसेवा

Thane News : ठाणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी २६ एप्रिल पासून अर्ज वितरीत व दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली.

अर्ज दाखल करण्याच्या खेरच्या दिवसापर्यंत ठाणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदार संघासाठी ३५५ नामनिर्देशन अर्ज वितरीत करण्यात आले. त्यापैकी १३६ नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले असून त्यामध्ये १११ उमेदवारी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले आहे. त्यात शनिवारी अर्ज छाननी प्रक्रियेत २० अर्ज अवैध तर, ९१ अर्ज वैध ठरले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. तर, उमेदवारांकडून प्रचाराचा धुरळा उडविला जात आहेत. अशातच महत्वाच्या राजकीय पक्षांकडून मोठे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात तीन लोकसभा मतदार संघासाठी २६ एप्रिलपासून नामनिर्देश अर्ज दाखल व वितरीत करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ३ मे अंतिम तारीख होती. या कालावधीत जिल्ह्यात ३५५ नामनिर्देशन अर्ज वितरीत करण्यात आले.

त्यापैकी १३६ नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले असून १११ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केली आहे. यामध्ये काही उमेदवारांकडून दोन तर, काही उमेदवारांनी चारचार अर्ज दाखल केले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

तर, शनिवारी अर्ज छाननी प्रक्रियेत २० अर्ज अवैध तर, ९१ अर्ज वैध ठरले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. यामध्ये कल्याण लोकसभा मतदार संघात सर्वाधिक १३७ नामनिर्देश अर्ज वितरीत करण्यात आले.

त्यापैकी ४५ नामनिर्देश अर्ज दाखल करण्यात आले असून ३४ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्जांची संख्या आहे. त्यात शनिवारी अर्ज छाननी प्रक्रियेत ३४ पैकी ४ अर्ज अवैध ठरल्याने ३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

भिवंडी लोकसभा मतदार संघात ११३ नामनिर्देश अर्ज वितरीत करण्यात आले. त्यापैकी ४८ नामनिर्देश अर्ज दाखल करण्यात आले असून ४१ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्जांची संख्या आहे. त्यात शनिवारी अर्ज छाननी प्रक्रियेत ४१ पैकी ५ अर्ज अवैध ठरल्याने ३६ अर्ज वैध ठरले आहेत. तर, ठाणे लोकसभेसाठी १०५ नामनिर्देश अर्ज वितरीत करण्यात आले.

त्यापैकी ४३ नामनिर्देश अर्ज दाखल करण्यात आले असून ३६ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्जांची संख्या आहे. अर्ज छाननी प्रक्रियेत ३६ पैकी सर्वाधिक ११ अर्ज अवैध ठरल्याने २५ अर्ज वैध ठरले आहे. असे असले तरी, अर्ज माघारी नंतरच प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात किती उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकतील हे स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: ''माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही'', 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या आरोपावर सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

एक नायक तर दुसरी खलनायिका; टीव्हीचे गाजलेले चेहरे पुन्हा भेटीला येणार; कोण आहेत ते? प्रेक्षकांनी सांगितली नावं

Jalgaon News : खेळता खेळता हरवला जीव! जळगावात १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Electricity Supply: अदानी हटाव..., प्रीपेड मीटरला ग्राहकांचा नकार; महावितरण खाजगीकरणाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune Market Committee : संचालक मंडळ बरखास्त करून ईडी व इन्कम टॅक्स चौकशी करा; राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष विकास लवांडे यांची मागणी

SCROLL FOR NEXT