मुंबई

रिक्षाचालकांची मुजोरी कमी होईना! 

सकाळवृत्तसेवा

ठाणे - रेल्वेस्थानक परिसरातील काही मोजक्‍या रिक्षाचालकांची मुजोरी पुन्हा वाढली आहे. सॅटीसखालील काही मोजकी ठिकाणे या रिक्षाचालकांकडून अडवून ठेवण्यास सुरुवात झाली आहे. या रिक्षाचालकांविरोधात वाहतूक विभागाकडून तात्पुरती कारवाई करण्यात येत आहे; परंतु वाहतूक पोलिसांची पाठ फिरताच या रिक्षाचालकांकडून सॅटीस परिसराचा ताबा घेतला जात आहे. त्यातही येथील वाहतूक चौकी हलविण्यात आल्याने या रिक्षाचालकांचे फावले आहे. 

मध्य रेल्वेच्या इतर रेल्वेस्थानकांपेक्षा ठाणे रेल्वेस्थानकातील रिक्षा थांबा मोठा आहे. येथे रिक्षाचालकांना शिस्त लागावी, यासाठी खास मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत. मात्र त्यानंतरही अद्याप काही मोजक्‍या रिक्षाचालकांकडून सुरुवातीच्या दोन रांगा अडवून ठेवल्या जातात. त्यांना या मार्गिकेमध्ये जागा अडवून लांबचे आणि त्यातही शहराबाहेरील भाडे हवे असते. या मोजक्‍या रिक्षाचालकांच्या बेशिस्त रांगेत ते इतर नियमित रिक्षाचालकांना घुसून देत नाहीत. मुळात या ठिकाणी कारवाईसाठी आलेल्या वाहतूक पोलिसांबरोबर संघटनेच्या नावाखाली हुज्जत घालण्यास हे बेशिस्त रिक्षाचालक मागे-पुढे पाहत नाहीत. सॅटीसच्या नियमित रिक्षा थांब्याच्या जागेबरोबरच सॅटीसखालील सर्वच ठिकाणी रांगेची शिस्त न पाळणाऱ्या रिक्षाचालकांची संख्या वाढते आहे. शेअर रिक्षाच्या नावाखाली या रिक्षाचालकांनी हा परिसर ताब्यात घेतल्यात जमा आहे. याचबरोबर आलोक हॉटेलसमोरील रस्ता तर वागळे इस्टेट परिसरात शेअर रिक्षा चालविणाऱ्या रिक्षाचालकांनी अनधिकृतपणे सकाळी सातपासून रात्री दहापर्यंत ताब्यात घेतला आहे. त्यांच्या रिक्षाच्या रांगाच रांगा येथे लागत आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. विशेष म्हणजे, हे रिक्षाचालक तीन प्रवासी मिळाल्यानंतर चौथ्या प्रवाशाची वाट पाहत जागा अडवत असल्याचे वारंवार पाहावयाला मिळते. त्यामुळे या रिक्षाचालकांना अधिकृत थांबे दिल्यानंतरही त्यांनी रस्तेच ताब्यात घेण्यास सुरुवात केल्याने पादचाऱ्यांना येथून चालणे शक्‍य होत नाही. वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई झाल्यानंतरही या मोजक्‍या रिक्षाचालकांचा हैदोस या परिसरात सुरू झाल्याने या प्रकरणी नक्की दाद कोठे मागायची, असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडला आहे. 

शेअर रिक्षासाठी अधिकृत थांबे दिल्यानंतरही काही मोजक्‍या रिक्षाचालकांमुळे पादचाऱ्यांना येथून चालणेदेखील शक्‍य होत नाही. गेले काही दिवस तर आम्ही खास आमच्या पद्धतीने यापैकी काही रिक्षाचालकांना सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत धडा शिकविला आहे. पण त्यानंतरही पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईत सातत्य नसल्याने या मोजक्‍या रिक्षाचालकांचे फावले आहे. कोणत्याही युनियनचा नेता बेशिस्त रिक्षाचालकांची बाजू कधीच घेणार नाही. या रिक्षाचालकांवर एकाच वेळी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई झाली पाहिजे. 
- संजय वाघुले, अध्यक्ष, भारतीय जनता रिक्षाचालक संघटना 

रिक्षाचालकांना त्यांच्या वागण्याबद्दल जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यास सर्व रिक्षाचालक एकत्र येऊन उलट नागरिकांनाच दमबाजी करतात. एवढेच नव्हे; तर आपल्या रिक्षाचा क्रमांक घेऊन तक्रार करण्याचा उलट सल्लाही देतात. अशा मोजक्‍या मुजोर रिक्षाचालकांमुळे सर्वच रिक्षाचालकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असतो. त्यामुळे अशा मुजोर रिक्षाचालकांना नव्हे; तर नियमित चांगली सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांना नागरिकांच्या संतापाला वारंवार सामोरे जावे लागते. 
- विनोद घोडके, पादचारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT