मुंबई : राज्यातला सत्तेचा तिढा सुटण्याच्या मार्गावर असतानाच, त्याचं प्रतिबिंब ठाण्यातही उमटल्याचं पाहायला मिळाले आहे. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, असं वारंवार निक्षून सांगणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं ठाण्यात झालेले जंगी स्वागत जणू हेच सुचवत होते, ही तुमच्यासमोर आहे ती व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर लवकरच विराजमान होणार आहे असा संदेश देणारे स्वागत ठाणेकरांनी उद्धव ठाकरे यांचं केले आहे.
उद्धव ठाकरेंच्या या जंगी स्वागताचं कारण होतं, ते ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि सभागृह नेते नरेश म्हस्के आणि उपमहापौरपदी शिवसेनेच्याच पल्लवी कदम यांची झालेली निवड. ठाणे आणि शिवसेना हे जणू अतूट नातं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर 1967 मध्ये शिवसेनेला ठाण्यानंच सत्तेची वाट दाखवली होती. ठाणे महापालिकेची स्थापना झाल्यानंतर सतीश प्रधान यांची महापौरपदी निवड थेट बाळासाहेब ठाकरेंनी केली होती.
विनायक राऊत यांना प्रमोद जठार यांनी दिले 'हे' आव्हान
आताही शिवसेनेचा हा दबदबा ठाण्यात दिसतो. शिवसेनेच्या विनंतीवरून राष्ट्रवादीनं आताच्या महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली होती. इतकंच कशाला शिवसेनेच्या जल्लोषाला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचीही हजेरी लागलेली दिसली. त्यामुळे निमित्त महापौरपदाच्या निवडीचं असलं उद्धव ठाकरेंचं स्वागत सध्या तरी तेच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत, हे शिवसेनेनं या शक्तिप्रदर्शनातून दाखवून दिलं, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.