मुंबई

परळीत विषबाधेने तीन बकऱ्या दगावल्या

अमित गवळे

पाली : सुधागड तालुक्‍यातील परळी येथे तीन बकऱ्यांचा विषबाधेने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. 30) मध्यरात्री 2 वाजता घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, परळी येथील रूपेश जाधव यांच्या एकूण 15 बकऱ्या आहेत. या बकऱ्यांचे संगोपन व निगा राखण्याचे काम ते परळी-घोटवडे मार्गावरील वाड्यात करीत आहेत. 

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने विषारी औषध तांदळात मिसळून बकऱ्यांपुढे ठेवले. 15 बकऱ्यांपैकी तीन बकऱ्यांचा ते खाल्ल्याने मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती मिळताच पशुपालक रूपेश जाधव यांनी घटनास्थळी जाऊन विषारी औषध दूर केल्यामुळे अन्य 12 बकऱ्यांचे प्राण वाचले. या प्रकाराची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जाधव यांनी केली. याआधी पाच दिवसांपूर्वी पाली सावंत आळी येथील वनिता पाटील यांच्या पाच बकऱ्या अचानकपणे दगावल्या होत्या. त्यामुळे सुधागड तालुक्‍यातील पशुपालक घाबरले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT