मुंबई

गावित भगिनींची फाशीची शिक्षा योग्यच!

CD
गावित भगिनींची फाशीची शिक्षा योग्यच! सरकारचे उच्च न्यायालयात समर्थन सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २२ : निरागस बालकांचे अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या केल्याच्या आरोपात दोषी ठरलेल्या गावित भगिनींची फाशीची शिक्षा योग्यच असल्याचे समर्थन राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात आज केले. नव्वदच्या दशकात कोल्हापूरमधील अंजनाबाई गावित आणि तिच्या दोन मुलींनी १३ मुलांचे अपहरण केले होते आणि त्यापैकी नऊ जणांची हत्या केली. या आरोपात त्यांना सन २००६ मध्ये फाशी सुनावण्यात आली. उच्च न्यायालय, तसेच सर्वोच्च न्यायालयाने ही फाशी कायम ठेवली. तसेच राष्ट्रपतींनीदेखील दोघींचा दयेचा अर्ज फेटाळला; मात्र अद्याप फाशीवर अंमलबजावणी झाली नाही. अंजनाबाई यांचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला, तर रेणुकाचा नवरा किरण माफीचा साक्षीदार झाला होता. वीस वर्षांपूर्वी दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर अद्यापही अंमलबजावणी न झाल्यामुळे आरोपींना आता जीवन जगायचे आहे आणि त्यासाठी त्यांना दिलेली फाशी रद्द करून जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी रेणुका शिंदे आणि सीमा गावित या भगिनींनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली. त्यावर आज न्या. नितीन जामदार आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राज्य सरकारने या याचिकेला विरोध केला असून दोघींचा गुन्हा भयावह आहे. त्यामुळे फाशी योग्य असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Warren Buffett: वॉरेन बफेंसारखी गुंतवणूक करायला शिका; कमवाल करोडो रुपये, काय आहे त्यांची स्ट्रॅटेजी?

HBD MS Dhoni: एमएस धोनीच्या नावावर असलेले असे ५ रेकॉर्ड जे मोडणं कोणालाही आहे महाकठीण

Chandrakant Patil: पुणे पोलिस दलात लवकरच एक हजार जणांना घेणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती

11th Class Admission: अकरावीच्या प्रवेशासाठी आज अखेरची संधी; ३२ हजार विद्यार्थ्यांनी निश्चित केला प्रवेश

Solapur News: 'मुख्यमंत्र्यांसमवेत कल्याणशेट्टी अन्‌ मानेंची चर्चा'; माजी खासदार थांबले काही अंतरावर, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT