मुंबई

संप बेकायदा ठरल्यास एसटीच्या कारवाया वैध ठरणार

CD
संप बेकायदा ठरल्यास एसटीच्या कारवाया वैध ठरणार कर्मचाऱ्यांची अडचणी वाढण्याची शक्यता सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २५ : महाराष्ट्र कामगार संघटनांना मान्यता देणे आणि अनुचित प्रथा प्रतिबंध कायदा एमआरटीयू आणि पीयूएलपी-१९७१ या कायद्यानुसार संप बेकायदा आहे की कायदेशीर, हे ठरवण्याचे अधिकार कामगार न्यायालयाला अधिकार आहे. कामगार न्यायालयाने हा संप बेकायदा ठरवल्यास एसटी प्रशासनाने केलेल्या कारवाई वैध ठरणार आहे. लोकोपयोगी सेवा असल्यास औद्योगिक कलह कायदा-१९४७ (कलम २२) नुसार ४५ दिवसांपूर्वी अगोदर संपाची नोटीस द्यावी लागते. ४५ दिवस संपाची नोटीस देण्याची व कायद्यातील इतर तरतुदींनुसार प्रक्रियाच पूर्ण न झाल्याने २७ ऑक्टोंबर पासून बेकायदा संप आणि कामबंद आंदोलन यासंदर्भात बेकायदेशीर संपासाठी एसटी प्रशासनाने संदर्भ यूएलपी तक्रार अर्ज याचिका दाखल केली आहे. राज्यातील वेगवेगळ्या विभागाच्यावतीने संदर्भ यूएलपी तक्रार अर्ज या याचिका दाखल केल्या आहे. यापैकी काही कामगार न्यायालयात सुनावणी अंतिम टप्यात सुरू आहे, तर काही न्यायालयांमध्ये बेकायदेशीर संप ठरवण्याची प्रक्रिया सुरू आहे. कामगार न्यायालयाने संप बेकायदा ठरवल्यास निलंबन, सेवासमाप्ती, बडतर्फी या कारवाया वैध ठरवल्या जाणार आहे. तसेच एका दिवसासाठी आठ दिवसांची वेतनकपात केली जाणार आहे. त्यामुळे संपातील एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. -- राज्यभरातील कामगार न्यायालयात संप बेकायदा ठरवण्याची प्रक्रिया सुरू आहे. कायद्यानुसार लोकोपयोगी सेवा असल्यास ४५ दिवस अगोदर संपाची नोटीस देऊन प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने हा संप बेकायदा ठरण्याची शक्यता आहे. - शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''...कारण आम्ही भटके आहोत'', बंजारा-वंजारा वादावरुन धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Updates : कुणबी प्रमाणपत्रासाठी काटेकोर पडताळणी अनिवार्य - बावनकुळे

IND A vs AUS A: १९ वर्षाच्या पोराने भारतीय गोलंदाजांना झोडले, लखनौमध्ये शतक; श्रेयसचं नशीब महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने त्याला OUT केले

Agricultural News : कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न: इगतपुरीचे शेतकरी बांबू लागवडीकडे वळले

"यांचे अजून बारा वाजले नाहीत का ?" उपमुख्यमंत्र्यांच्या बैठीकीनंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थे ! चेतना भट्टच्या नवऱ्याचा संताप

SCROLL FOR NEXT