मुंबई

पूरग्रस्त शेतकरी अजूनही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत मनसेने दिले तहसीलदारांना पत्र

CD
भिवंडी तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी मनसेचा तहसीलदारांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा वज्रेश्वरी, ता. ८ (बातमीदार) : जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. राज्य सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान पाहता तातडीने मदत जाहीर तर केली; मात्र आजतागायत ही मदत शेतकऱ्यांना न मिळाल्याने ही मदत ताबडतोब नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जावी, अशी मागणी मनविसेचे तालुकाध्यक्ष परेश चौधरी यांनी केली आहे. भिवंडीतील तालुका स्तरावरील सर्व मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांचे पंचनामे वेळेत पूर्ण करूनसुद्धा शासनाने केलेली नुकसानभरपाईची मदत शेतकऱ्यांपर्यंत अद्याप पोहोचली नाही. मागच्या महिन्यात तहसीलदारांनी पुरात मालमत्तेचे नुकसान झालेल्या लाभधारकांना भरपाईची मदत देऊ केली होती, पण बाधित शेतकऱ्यांपर्यंत अद्याप मदत पोहोचलेली नाही. याप्रश्नी शेतकऱ्यांकडून सातत्याने पक्षाकडे तक्रारी येत होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष परेश चौधरी यांनी तहसीलदारांना निवेदन देत शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईची रक्कम मिळवून द्यावी अशी मागणी केली. तसेच येत्या सात दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये भरपाईची रक्कम वर्ग करण्यात यावी; अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी सूचना मनसेच्या शिष्टमंडळाद्वारे देण्यात आली. या शिष्टमंडळात तालुका उपाध्यक्ष हनुमान वारघडे, श्रीकांत गोने, प्रशांत गायकवाड, सिद्धार्थ खाणे, कुणाल अहिरे, तुषार खारेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT