मुंबई

थंडीच्या कडाक्यात आजारांत वाढ

CD
थंडीच्या कडाक्यात आजारांत वाढ रोहा शहरात ताप, कावीळने नागरिक त्रस्त रोहा, ता. १२ (बातमीदार) : तीन ते चार दिवसांपासून वातावरणाचा पारा खाली घसरल्याने थंडीचा कडाकाही वाढला आहे. वातावरणात बदल झाल्याने नागरिक आजारी होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहेत. मागील महिनाभरात शहरात ताप आणि कावीळचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. याविषयी प्रशासनाकडून विशेष खबरदारी अद्याप घेतली गेली नसल्याने नगरपालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. थंडीचा मोसम आणि सर्दी, खोकला व ताप यांचा जवळचा संबंध आहे. अवकाळी पाऊस आणि थंडी वाढल्याने सामान्य आजारांनी डोक वर काढले आहेत. सरकारी आणि खासगी दवाखान्यांत रुग्णांची संख्या वाढली आहे. रोज १०० पेक्षा अधिक तापाचे, तर २० ते २५ रुग्ण कावीळ रोगांवर उपचार घेत आहेत. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात ताप आणि कावीळचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर असल्याने सर्वत्र चिंतेचा वातावरण निर्माण झाले आहे. आठ दिवसांपासून पहाटे पडणारे दाट धुके सकाळचे ११ वाजले तरी हटत नसल्याने वातावरणातील कमाल गारवा हा टिकून राहत आहे. सकाळी ११ वाजले तरी कमालीची बोचरी थंडी जाणवत आहे. याशिवाय सायंकाळी ४ वाजल्यापासूनच हवेत गारवा निर्माण होत आहे. थंडीच्या त्रासामुळे सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढू लागल्याने सरकारी दवाखान्याप्रमाणे खाजगीमध्येही रुग्ण भरलेले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण तापाचे आहेत. त्या खालोखाल कावीळचे रुग्ण सापडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. थंडीत थोडी ऊब मिळावी यासाठी शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा वाढला आहे. थंडीच्या दिवसात प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी. आपले आरोग्य निकोप कसे राहील, याकडे लक्ष देण्याची सूचना तज्‍ज्ञ डॉक्टरांनी दिल्या आहेत. ----------------------- महिनाभरापासून रोह्यात तापाचे रुग्ण वाढत आहेत. दररोज ६० ते ७० रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच २० ते २२ दिवसांत कावीळचे रुग्णही आढळून येत आहेत. तपासणीसाठी येणाया रुग्णांत रोज पाच ते सहा कावीळ आजार असल्याचे निष्पन्न झाले आहेत. - डॉ. फरीद चिमावकर वातावरणात बदल झाल्याने तापाचे रुग्णांसह कावीळचे रुग्णही वाढत आहेत. ही माहिती मला आताच समजली आहे. या रोगाचा प्रसार होऊ नये, यासाठी नगरपालिका प्रशासन नक्कीच खबरदारी घेईल. त्यावर जनजागृती करण्यात येईल. - दयानंद गोरे, मुख्याधिकारी, रोहा नगरपालिका रोहा शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दररोज जवळपास १०० ते १२५ रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. यापैकी जवळपास ७० ते ८० रुग्णांना ताप असतो. सध्या वातावरणात बदल होत असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. ताप आल्यास तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे आणि योग्य वेळी उपचार करून घ्यावे. - डॉ. अंकिता खेरकर, उपअधीक्षक, रोहा उपजिल्हा रुग्णालय रोहा : थंडीत गारठलेले रोहेकर शेकोटीचा शेक घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT