मुंबई

एसटीच्या विलीनीकरणासाठी नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सकाळ वृत्तसेवा

पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद उघडकीस आला आहे.

मुंबई - शिवसेना (Shivsena) आमदार संतोष बांगर, तानाजी सावंत यांनी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही विलीनीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

गेल्या अडीच महिन्यापासून एसटीच्या कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणासाठी संप सुरू आहे. त्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य शासनाला तीन सदस्यीय समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते. येत्या २० जानेवारीला समितीचा दिलेला १२ आठवड्यांचा कालावधी पूर्ण होणार आहे; मात्र त्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनावेळी विलीनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते.

याबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांनी संपकऱ्यांना वेळोवेळी सांगण्यात आले. त्यामुळे विलीनीकरणाऐवजी एसटी कर्मचाऱ्यांच्या भत्ते आणि मूळ वेतनात वाढ देण्यात आली आहे. शिवाय यापुढेही नियमित वेतन करार आणि वेतनाच्या फरकामध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्याचे आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले; मात्र आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे विलीनीकरणाच्या शिफारशींचं पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद उघडकीस आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT