मुंबई

कल्याण तालुक्यातील १८ गावांना जीवन प्राधिकरणाद्वारे पाणी

CD
कल्याणमधील १८ गावांना जीवन प्राधिकरणाद्वारे पाणी २४ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर टिटवाळा, ता. १३ (बातमीदार) ः कल्याण तालुक्यातील १८ गावांसाठी रायते येथे उल्हास नदीवर स्वतंत्र पाणी योजना मंजूर केली आहे. जीवन प्राधिकरण अंतर्गत ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी आर्थिक निधीची तरतूद करण्यात आली २४ कोटी ५० लाखांहून अधिक रक्कम त्यासाठी मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली. कल्याण तालुक्यातील रायते, गोवेली, घोटसई, रेवती, बापसाई, नवगाव, कोळीब, मामनोली, आणखर, आणखरपाडा, वाहोळी, आपटी, केळणी, आपटी बार्हे या गावासाठी रायते येथे प्रादेशिक नळ पाणी योजना सुरू होती. या योजनेला ५० वर्षे उलटल्यामुळे योजना चालवणे खर्चिक बनले होते. ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी जीवन प्राधिकरण अंतर्गत या योजनेची पुनर्बांधणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. त्यासाठी स्वतंत्र बैठका घेऊन अखेर नुकताच राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात पुरवणी मागण्याप्रसंगी या योजनेसाठी आर्थिक निधीची तरतूद करण्यात आली, असे आमदार कथोरे यांनी सांगितले. लवकरच निविदा प्रक्रिया राबवणार रायते येथे या योजनेची उभारणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. लवकरच या योजनेची निविदा निघणार असून या योजनेचे काम सुरू करण्यात येणार आहे. यापूर्वी खडवली येथे जीवन प्राधिकरणअंतर्गत पाणी योजना उभारणीचे काम सुरू आहे. रायते येथील योजना काही ग्रामपंचायतींनी ठराव देण्यास विलंब केल्याने रखडली होती ती आता मार्गी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Decision: शहरात उपचार सोपे, गावात सुविधा वाढणार... मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोककेंद्रित महत्त्वाचे निर्णय!

Pune Traffic: चांदणी चौकात महामार्ग ओलांडताना जीवघेणी कसरत; प्रवाशांची गैरसोय : पादचारी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : भात पिकाच्या नुकसानीसाठी भरपाईची मागणी; मुळशी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

IPL 2026 Update: काव्या मारनचा धक्कादायक निर्णय घेण्याच्या तयारीत, असं करण्याची खरच गरज आहे का? सनरायझर्स हैदराबाद...

जगात कुठं असं होतं का? प्रकल्प रखडल्यानं फडणवीस कंत्राटदारांवर संतापले, म्हणाले, १५ दिवसात पूर्ण करा

SCROLL FOR NEXT