cyclone esakal
मुंबई

मुंबई : नैसर्गिक संकटांत ३४० व्यक्तींचा मृत्यू

CD

मुंबई : २०२१ मध्ये राज्याला चक्रीवादळे, अतिवृष्टी, भूस्खलन आणि दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तींचा (Natural calamities) मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला. त्यात मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान आणि जीवितहानी झाली. गेल्या वर्षभरात ३४० व्यक्तींचा अशा प्रकारच्या संकटात मृत्यू झाल्याची (people death) माहिती हवामान विभागाचे संचालक (पुणे विभाग) के. एस. होसाळीकर (k s hosalikar) यांनी एका ट्विटद्वारे दिली आहे. २०२१ मध्ये पाच उष्णकटिबंधीय चक्रीवादळे उत्तर हिंद महासागरात (Hindi ocean) तयार झाली. शिवाय बंगालच्या उपसागरावर तीन आणि अरबी समुद्रावर दोन चक्रीवादळे झाली. (three hundred and fourty people died due to natural calamities)

त्या व्यतिरिक्त अत्यंत मुसळधार पावसामुळे पूर, भूस्खलन, वीज पडणे, गडगडाट, दुष्काळ इत्यादी दुर्घटनाही राज्याच्या विविध भागांत घडल्या. भारतीय हवामान विभागाने २०२१ मधील तापमान आणि पावसाच्या हंगामाबाबतचा आपला वार्षिक अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार २०२१ मध्ये भारतातील वार्षिक सरासरी जमिनीच्या पृष्ठभागावरील हवेचे तापमान सरासरीपेक्षा ०.४४ अंश सेल्सिअसने जास्त होते.

१९०१ मध्ये देशव्यापी नोंदी सुरू झाल्यापासून २०२१ हे पाचवे सर्वात उष्ण वर्ष ठरले. तथापि, २०१६ मध्ये भारतात आढळलेल्या सर्वाधिक तापमानवाढीपेक्षा ते कमी आहे. २०२१ हे पाचवे सर्वांत उष्ण वर्ष १९९७ पासून देशातील तापमान सरासरीच्या तुलनेत वाढलेलेच दिसून येत आहे. सुमारे २५ वर्षांच्या कालावधीत एकदाही वार्षिक तापमान सरासरीच्या खाली नोंदविले गेले नसल्याचे १९०१ पासूनच्या नोंदीवरून स्पष्ट होते. १२० वर्षांमध्ये २०२१ हे पाचवे सर्वांत उष्ण वर्ष ठरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT