Excise duty in hotels  sakal media
मुंबई

उत्पादनशुल्क वाढीचा ‘आहार’कडून निषेध

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील हॉटेलांच्या उत्पादन शुल्कात सुमारे पंधरा टक्के वाढ करण्याच्या राज्य सरकारच्या (Maharashtra Government) निर्णयाचा हॉटेलचालक संघटना ‘आहार’तर्फे (Hotel union Ahar) निषेध करण्यात आला. राज्य सरकारने नुकताच यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार मुंबईतील हॉटेलांचे (Hotels in mumbai) गेल्या वर्षीचे शुल्क सहा लाख ९३ हजार रुपये होते, आता ते सात लाख ९७ हजार रुपये होईल. कोरोनामुळे सध्या हॉटेल उद्योग अडचणीतून जात असताना सरकारने आम्हाला साह्य करणे अपेक्षित होते, असे संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी म्हटले आहे.

हॉटेलांच्या परवाना शुल्कात निम्मी कपात करण्याची विनंती आम्ही सरकारला केली होती. त्याऐवजी सरकारने केलेली ही शुल्कवाढ हा आम्हाला मोठाच हादरा आहे, असेही शेट्टी म्हणाले. असे असेल तर सरकारबरोबर होणाऱ्या बैठकांचा उपयोग काय, आम्हाला मदत करण्याची इच्छाशक्ती सरकारकडे आहे का, याची आम्हाला शंका येत आहे, अशी तीव्र प्रतिक्रियाही शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

उद्योगाने तग कसा धरावा? कोरोनाचा फैलाव मार्च २०२० पासून सुरू झाल्यावर हॉटेल पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने सुरू राहिली असे जेमतेम १५-२० दिवसच गेले असतील. एरवी फक्त पार्सल किंवा दुपारी चार वाजेपर्यंत वा रात्री दहा वाजेपर्यंत तेही निम्म्या क्षमतेने असाच आमचा व्यवसाय सुरू होता. आता करसवलत देण्याऐवजी करवाढ झाली तर लाखो जणांना रोजगार देणाऱ्या या उद्योगाने तग कसा धरावा, असा प्रश्नही शेट्टी यांनी विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT