Hardeep singh puri sakal media
मुंबई

ठाणे पालिकेची चौकशी सुरू; १५० कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसल्याचा भाजपचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे महापालिका (Thane Municipal corporation) स्मार्ट सिटी प्रकल्पांमधील (Smart city project) नवनवीन घोटा‌ळ्यांची केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी (Hardeep singh puri) यांनी चौकशी सुरू केली असतानाच, या प्रकल्पांचे आर्थिक नियोजन करताना सत्ताधारी शिवसेना (shivsena) आणि पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे ठाणेकरांना १५० कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसला आहे, असा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या नगरविकास विभागाने ठाणे महापालिकेला नुकतेच पत्र पाठवून स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे, अशी माहिती भाजपचे उपाध्यक्ष सुजय पत्की (Sujay Patki) यांनी दिली आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत मोठे प्रकल्प राबविले जात आहेत. यामध्ये खाडीकिनारी सुशोभीकरण प्रकल्प, कोपरी येथील सॅटीस पूल, गावदेवी मैदान येथे वाहनतळ तयार करणे अशा काही महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. ही कामे मुदत उलटूनही पूर्ण झालेली नाहीत. या प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार झाला असून याप्रकरणी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी चौकशी सुरू केली आहे. असे असतानाच या प्रकल्पांचे आर्थिक नियोजन करताना सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे ठाणेकरांना दीडशे कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसला आहे, असा आरोप भाजपचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुजय पत्की यांनी केला आहे.

भाजप नेत्यांचा पाठपुरावा

स्मार्ट सिटीच्या प्रकल्पामध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनीही केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीपसिंह पुरी यांच्याकडे करून विशेष बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार ७ डिसेंबरला केंद्रीय नगरविकास खात्यातर्फे एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत हरदीपसिंह पुरी यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश दिले होते. याबाबत ६ जानेवारीला केंद्राच्या स्मार्ट सिटी मिशनकडून राज्य सरकारच्या नगरविकास विभागाला पत्र पाठविण्यात आले होते.

परंतु या विभागाने पत्रानुसार काहीच कारवाई सुरू केली नव्हती. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे ठाणे शहराध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी पाठपुरावा केल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागाने ठाणे महापालिकेला नुकतेच पत्र पाठवून स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT