सुधागड वीज समस्येचा आवाज थेट विधिमंडळात
शिवसेना उबाठाचे आमदार हारून खान यांचा आक्रमक पवित्रा
पाली, ता. ६ (वार्ताहर) ः सध्या विधानसभेत पावसाळी अधिवेशन सुरू असून, गेल्या चार दिवसांपासून विरोधक विविध प्रश्नांवरून आक्रमक होत सरकारला धारेवर धरीत आहेत. अशावेळी विधानसभेत वर्सोवाचे शिवसेना उबाठाचे आमदार हारून खान यांनी थेट सुधागड तालुक्यातील वीज समस्येवर विधिमंडळात आवाज उठवला. या वेळी ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. येथील स्थानिक आमदारांनी मात्र अशा ज्वलंत प्रश्नावर आवाज न उठवल्याने स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष आहे.
सुधागड तालुक्यात मागील काही दिवसांपासून विजेची समस्या निर्माण झाली आहे. वाघोशी गावामध्ये दर चार दिवसांनी वीजपुरवठा खंडित होतो. पावसाळ्यात विजेचे खांब पडण्याच्या घटना घडतात. त्यानंतर महावितरणकडून हे खांब बदलण्यात येतात. मात्र पावसाळ्यापूर्वीच महावितरण धोकादायक खांब बदलण्याचे व दुरुस्ती करण्याचे काम का करीत नाही, असा सवाल या ठिकाणी आमदारांनी उपस्थित केला. नुकताच वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा व मुख्यालयी राहणारा लाइनमन मिळावा, याकरिता वाघोशी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पालीतील महावितरण कार्यालयाला घेराव घातला होता. याबाबत विधिमंडळामध्ये आवाज उठवल्याने नागरिकांना न्याय मिळून विजेची समस्या मार्गी लागेल, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
...............
स्थानिक आमदारांना विसर
विशेष म्हणजे येथील स्थानिक आमदारांनी कधीही या प्रश्नावर आवाज उठवला नाही. दरम्यान, वर्सोवाचे शिवसेना उबाठाचे आमदार हारून खान यांनी सुधागड तालुक्यातील विजेच्या प्रश्नावर आवाज उठविल्याने सुधागडच्या नागरिकांनी त्यांचे आभार मानले आणि स्थानिक आमदारांनीदेखील येथील प्रश्नावर आवाज उठवावा, अशी अपेक्षा केली. यासंदर्भात सोशल मीडियावरतीदेखील नागरिक आपल्या भावना व्यक्त करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.