मुंबई

एन.सी.सी. विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

CD

एन.सी.सी. विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
रायगडमध्ये १७५ कॅडेट्ससाठी आठ दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर
अलिबाग : भौगोलिक रचनेमुळे रायगड जिल्हा आपत्तीप्रवण म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जिल्ह्यात पूरस्थिती, दरड कोसळण्याच्या घटना, चक्रीवादळ, अतिवृष्टी, आगीचे प्रकार तसेच औद्योगिक अपघात यांसारख्या विविध स्वरूपाच्या आपत्ती सातत्याने घडत असतात. अशा आपत्तींच्या काळात जीवित व वित्तहानी कमी करण्यासाठी तातडीने आणि नियोजनबद्ध मदतकार्य राबवणे अत्यंत आवश्यक असते. मात्र जिल्ह्यात आपत्ती निवारणासाठी आवश्यक तेवढे प्रशिक्षित मनुष्यबळ कमी पडत असल्याची बाब अनेक वेळा अधोरेखित झाली आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुढाकारातून राष्ट्रीय छात्रसेना (एन.सी.सी.)च्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील निवडक १७५ एन.सी.सी. कॅडेट्ससाठी २ जानेवारीपासून आठ दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर अलिबाग येथील जे. एस. एन. कॉलेज परिसरात यशस्वीरीत्या पार पडले.

या प्रशिक्षण शिबिरासाठी भारतीय सेनेच्या माध्यमातून तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी विशेष संस्थेला आमंत्रित करण्यात आल्याने शिबिराला अधिक व्यावसायिक, शिस्तबद्ध आणि परिणामकारक स्वरूप प्राप्त झाले. आठ दिवस चाललेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांना आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीच्या काळातील बचाव व मदतकार्य, प्राथमिक उपचार पद्धती, शोध व बचाव कार्य, दोरखंडाच्या साहाय्याने बचाव तंत्र, पाण्यातील बचावकार्य, आग नियंत्रणाच्या उपाययोजना तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्याच्या पद्धती यांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले.

यासोबतच आपत्तीच्या प्रसंगी विविध यंत्रणांमध्ये समन्वय कसा साधायचा, नेतृत्वगुण कसे विकसित करायचे, शिस्त पाळत मानसिक स्थैर्य कसे राखायचे, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. केवळ सैद्धांतिक माहितीपुरती मर्यादा न ठेवता प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांवर विशेष भर देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना वास्तव परिस्थितीत काम करण्याचा अनुभव मिळाला.

या संदर्भात रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी सांगितले की, “रायगड जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी एन.सी.सी.सारख्या शिस्तबद्ध आणि प्रशिक्षित युवकांचा सहभाग वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांवर विशेष भर देण्यात आला असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना आपत्तीच्या वेळी प्रत्यक्ष काम करण्याची आत्मविश्वासपूर्ण तयारी झाली आहे. भारतीय सेनेच्या प्रशिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.”

या प्रशिक्षण शिबिरामुळे भविष्यात रायगड जिल्ह्यात आपत्तीच्या काळात प्रशिक्षित स्वयंसेवक म्हणून एन.सी.सी. कॅडेट्स महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत असून, हा उपक्रम आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Visa Suspend: अमेरिकेचा मोठा निर्णय! रशिया, इराणसह ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया थांबवली; भारत आणि पाकिस्तानचं काय? जाणून घ्या...

IND vs NZ, 2nd ODI: भारतावर पराभवाची संक्रांत! डॅरिल मिशेलचं शतक, विल यंगनेही दिली भक्कम साथ; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

सोलापूर महापालिका निवडणूक! ३५०० पोलिसांचा ४८ तास खडा पहारा; क्युआरटी, आरसीपी, एसआरपीएफच्याही तुकड्या; शहरात ४६ ठिकाणी फिक्स पॉइंट

Latest Marathi News Live Update : निवडणुकीत कुणालाही पाठिंबा नाही - मनोज जरांगे

SSC and HSC Exam Centers: मोठी बातमी! दहावी-बारावीच्या 107 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द; पाहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT