मुंबई

रखडलेल्‍या पुलामुळे वाहतूक विस्‍कळित

CD

महाड, ता. ११ (बातमीदार) : महाड ते रायगड मार्गावर असलेल्या लाडवली येथील नव्या पुलाचे बांधकाम अपूर्ण असल्याने पावसाळ्यात वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्‍या आठवड्यात दोन-तीन दिवस झालेल्या पावसामुळे पुलावरील वाहतूक विस्कळित झाली होती.
रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या शिवप्रेमींकरिता तसेच या भागातील प्रवाशांकरिता महाड-रायगड मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग केला जात आहे. २०१९ पासून या मार्गाचे काम सुरू असून, अद्याप पूर्ण झालेले नाही. याच मार्गावर लाडवली येथे स्थानिक नदीवर असणारा पूल ३१ डिसेंबर २०२३ ला महामार्ग विभागाकडून पाडण्यात आला. त्यानंतर नव्या पुलाचे काम मे २०२४ अखेर पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु या कालावधीत साधी कामालाही सुरुवात न झाल्याने नदीमध्ये तात्पुरता मातीचा भराव करून मार्गावरील वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती, परंतु २०२४ च्या पावसाळ्यात भरावावरूनही पाणी जाऊ लागल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली व नागरिकांना पाच ते सहा किलोमीटरचा वळसा घेत अरुंद मार्गाने प्रवास करण्याची वेळ आली. या वेळी संतप्त झालेल्या ४० गावातील ग्रामस्थांनी १२ जून २०२४ ला या ठिकाणी आंदोलन केले होते. तत्कालीन प्रांताधिकारी यांनी, पुलाचे काम लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.
पावसाळ्यानंतर नदीवर पूल उभारण्यात आला तरी या ठिकाणी पुलावरून नागरिकांच्या रेट्यामुळे तात्पुरती वाहतूक सुरू आहे, परंतु पुलाचे रस्त्यावरील काम अद्यापही बाकी आहे. काही दिवसांपासून पडत असलेल्‍या पावसामुळे या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साठत असल्याने प्रवासी व वाहनचालकांना मार्गक्रमण करणे अवघड होत आहे. पुलावरून जाण्याच्या मार्गाचेही काम रखडले आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच ग्रामस्थांना यावर्षीदेखील आंदोलन करावे लागणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
महाड रायगड मार्गावरील लाडवली हा पूल महत्त्वाचा पूल असून, या पुलाच्या ठिकाणी प्रवाशांची गैरसोय झाल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते तसेच जून महिन्यामध्ये रायगडावर दोन राज्याभिषेक सोहळे पार पडत असतात. त्याकरितादेखील शिवप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. रायगडावर जाणारी ही सर्व वाहतूक पुलावरून होणार असल्याने महामार्ग विभागाने तातडीने पुलाचे काम पूर्ण करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. याबाबत महामार्ग विभागाचे अभियंता यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

गतवर्षी पुलाचे काम सुरू न झाल्याने आम्ही मोठे आंदोलन उभे केले होते, परंतु यावर्षीदेखील पूल उभा झाला असला तरीही अनेक कामे शिल्लक आहेत. त्यामुळे महामार्ग विभागाने पुन्हा आंदोलन करण्याची स्थिती निर्माण करू नये.
- महेश शिंदे, ग्रामस्थ, लाडवली

महाड ः पावसामुळे पुलाचे काम अपूर्ण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : तरुणांना १५ हजार रुपये मिळणार....पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा...काय आहे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना?

Independence Day: दिवाळीत मोदी देशाला देणार मोठे गिफ्ट, GST बद्दल केली मोठी घोषणा, करात मिळणार दिलासा

PM Narendra Modi Speech Live Update : राष्ट्रीय सुरक्षा कवच २०३५ पर्यंत आणखी मजबूत करणार- पंतप्रधान मोदी

Independence Day 2025 PM Modi : अणुधमक्यांना घाबरणार नाही, ब्लॅकमेल केलं तर...; मोदींचा लाल किल्ल्यावरून असीम मुनीरला इशारा!

Independence Day 2025 : आता मेड इन इंडिया 'सेमीकंडक्टर' चिप बाजारात येणार, पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरुन 'आत्मनिर्भर'ची गर्जना

SCROLL FOR NEXT