मुंबई

वाहन परवाना बाद झाला तरी नुकसान भरपाई

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १ : एखाद्या अपघातात जर वाहनचालकाचा परवाना बाद झाला असेल आणि त्याचे नूतनीकरण झाले नसेल तरीही चालकाच्या वारसांना वीमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळू शकते, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात स्पष्ट केले आहे. वाहन परवाना बाद झाला याचा अर्थ असा नाही की चालक कुशलतेने गाडी चालवत नव्हता, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले आहे. तसेच नोव्हेंबर २०११ मध्ये झालेल्या या अपघातातील मृत महिलेच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने आयसीआयसीआय लोम्बार्ड वीमा कंपनीला दिले आहेत.

पुण्यात हडपसर येथे राहणाऱ्या आशा बाविस्कर या दुचाकीवरून जात होत्या. त्यांच्या दुचाकीला ट्रकची धडक बसून त्यांचा मृत्यु झाला. मृत महिलेच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालयात मोटार अपघात तक्रार निवारण मंचाच्या निकालाविरोधात याचिका केली होती; मात्र चालकाचा परवाना रद्द झाला आहे, त्यामुळे नुकसान भरपाई मिळू शकत नाही, असा निर्णय मंचाच्या वतीने देण्यात आला होता. या विरोधात कुटुंबियांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्यायालयाने ही याचिका मंजूर केली आहे.

न्या. एस. जी. डिगे यांच्या न्यायालयात याचिकेवर सुनावणी झाली. वीमा कंपनीने विम्याचे हप्ते वसूल केले आहेत. त्यामुळे त्यांनी वारशांना नुकसान भरपाई द्यायला हवी. विमा कंपनीने ही रक्कम नंतर ट्रकचालकाकडून वसूल करावी; मात्र केवळ परवाना बाद झाला म्हणून भरपाई नाकारता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्मृतीच्या वडिलांनंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली, रुग्णालयात घेतले उपचार

सांगलीत ड्रंक अँड ड्राइव्हचा थरार! राँग साइडने चालवली स्कोडा, ६-७ वाहनांना धडक; अनेकजण जखमी

दुर्दैवी घटना! 'शेतीत मशागत करताना रोटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू'; कागल तालुक्यातील घटना, अचानक तोल गेला अन्..

CM Eknath Shinde: आमचा शत्रू फक्त महाविकास आघाडीच: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; स्थानिकमध्ये एकमेकांविरुद्ध लढलो म्हणजे शत्रू नाही

Crime News : पुण्यात घरफोडी करणारी तरुणींची टोळी, विदर्भातून सहा जणींना घेतलं ताब्यात; VIDEO झालेला व्हायरल

SCROLL FOR NEXT