मुंबई : कोरोनानंतर वाढीव व्याजदरामुळे घराच्या मागणीवर मोठा परिणाम झाला होता. मात्र आरबीआयने रेपो दरात कपात केल्याने गृहकर्ज स्वस्त होणार आहे. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील गृहबांधणीला चालना मिळण्याचा अंदाज आहे.
पाच वर्षांत प्रथमच आरबीआयने रेपो दरात कपात करीत ६.२५ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम रिअल इस्टेट क्षेत्रात दिसणार आहे. मुंबई महानगर प्रदेशाच्या गृहनिर्माण बाजारासाठी हा निर्णय गेम चेंजर ठरू शकतो. तसेच व्याजदरात थोडीशी कपात केली तरी मासिक ईएमआयमध्ये मोठी बचत होते. त्यामुळे गृहकर्ज सुलभ करून मागणी वाढवण्यासाठी चांगला निर्णय असल्याचे पल्लाडियन पार्टनर्स ॲडव्हायझरी लिमिटेडचे भागीदार कमल शाह यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.