उकाड्यामुळे
घामाच्या धारा
मुंबईत आर्द्रता ८० टक्क्यांवर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : शहरात तुरळक पाऊस सोडल्यास जुलैमध्ये पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे वातावरणात उष्णता वाढली असून आर्द्रता ८० टक्क्यांवर पोहोचल्याने मे महिन्यासारखे जाणवत आहे. सारखा घाम पुसावा लागत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
जुलैमध्ये साधारणत: सर्वाधिक पावसाची नोंद होते; मात्र पावसाने काही दिवसांपासून दडी मारली आहे. आज मुंबईत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २७ अंश सेल्सिअस इतके असल्याचे हवामान विभागाने सांगितले. रविवारीदेखील उकाडा कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार, शहर आणि उपनगरांत आकाश अंशतः ढगाळ असून संध्याकाळी किंवा रात्री गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, कोकण परिसरात मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
वाढत्या उकाड्यामुळे थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे यांसारख्या आजाराच्या तक्रारी वाढत आहेत. विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि हृदयविकाराचे रुग्ण यांच्यासाठी हे हवामान घातक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.